पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
आज मंगळवारी, १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल ९४.१०% लागला आहे. कोकण विभागाने सर्वाधिक निकाल नोंदवला असून नागपूर विभाग सर्वात मागे आहे. एकूणच, १५,५८,०२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी ९३.०४% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२% लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८% आहे. "सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९८.८२ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९०.७८%) आहे," असे बोर्डाने सांगितले.
निकालातील ठळक मुद्दे -
या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस बसले आणि त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी पास झाले. यामुळे एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१०% आहे.