पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
संत विचार पीठ व साने गुरुजी स्मारक समिती,पंढरपूर (महाराष्ट्र) यांच्यावतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये शिक्षक व खुल्या गटामध्ये, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेतील शिक्षक श्रीकांत चंदनशिवे यांचा तृतीय क्रमांक आला आहे.
त्यांनी "वारकरी संत विचार व साने गुरुजींचा श्री विठ्ठल मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह" या विषयावर अडीज हजार शब्द मर्यादेपर्यंत निबंध लेखन केले आहे. त्यांना आज प्रसिद्ध वक्ते ह.भ.प श्यामसुंदर सोन्नर महाराज परळी, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात इंगोले,श्रमिक दलाचे उपाध्यक्ष बार्गव पवार चिपळूण,शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडे यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिवाजी शिंदे,सारंग कोळी,दादासाहेब रोंगे, राजाभाऊ आवसक, बाळासाहेब सालविठ्ठल, नवनाथ पोरे,मोहन अनपट, ज्ञानेश्वर बंडगर आदी मान्यवर व विविध स्तरातील प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.