पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
चैत्री यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले. मंदीर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पुजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिरे समितीस 2 कोटी 56 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. चैत्र शुध्द 01 (दिनांक 30 मार्च) ते चैत्र शुध्द 15 (दिनांक 12 एप्रिल) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 2559092 रुपये अर्पण, 6399779 रुपये देणगी, 2621000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 3434708 रुपये भक्तनिवास , 2922100 पुजेच्या माध्यमातून, 6485204 रुपये हुंडीपेटी , 164774 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 1068398 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील वर्षी 2610396 रुपये देणगी, लाडूप्रसाद विक्रीतून 1906000, भक्तनिवास 752298 रुपये, 21000 रुपये पुजेच्या माध्यमातून, 4684124 रुपये हुंडीपेटीतून, 89259 रुपयाचे सोने-चांदीचे दागिणे अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 2610711 रुपये प्राप्त झाले होते.
तथापि, मागील वर्षी श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने, दिनांक 15 ते 21 एप्रिल, 2024 या चैत्री यात्रा कालावधीत पहाटे 5.00 ते रा.11.00 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते.
सन 2024 च्या चैत्री यात्रेत रू. 12673788/- व या वर्षीच्या यात्रेत रू. 25655055/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू.12981267/- इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असेही यावेळी श्री श्रोत्री यांनी सांगीतले.