विधवा विवाह करण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. नुकतेच अकोल्यातील अतुल आरोटे यांनी पती निधन झालेल्या सुलक्षणा भोर या तरुणीशी विवाह केला. विवाह करताना अतुल यांनी सुलक्षणा यांच्या दोन्ही मुलींचा स्वीकार केला व सुलक्षणा यांनी अतुलच्या मुलाचा स्वीकार करून एक आदर्श निर्माण केला.
आमच्या कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे आतापर्यंत ३० एकल महिलांचे विवाह लावले आहेत.स्वत: च्या दुःखातून बाहेर येत जीवनाची सुलक्षणा ने नव्याने सुरुवात केली..
या निर्णयाबद्दल या दाम्पत्याचा साऊ एकल महिला समितीचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी यांनी त्यांच्या घरी जाऊन साडी व शाल देऊन उभयतांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आरोटे कुटुंबीय व एकल समितीच्या वर्षा बेळे व सविता शेणकर उपस्थित होते.
अशा विवाहाला प्रोत्साहन देणारे मुलाचे आई वडील यांचेही कौतुक करण्यात आले.
निवृत्त बँक कर्मचारी असलेल्या सुशिक्षित कुटुंबातील व्यक्तींनी हा निर्णय घेतला आहे. समाजातील वेगवेगळ्या स्तरात असा निर्णय घेतल्याने समाजात विधवा विवाहाला प्रतिष्ठा प्राप्त होते आहे अशी भावना हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. समाजातील तरुणांनी विधवा विवाहाला प्राधान्य द्यावे व विधवा व एकल महिलांनी उरलेले आयुष्य एकटीने काढण्यापेक्षा आयुष्याची नवी सुरुवात करावी असेही आवाहन केले..
लेखक - हेरंब कुलकर्णी