अर्थ संकल्पित अधिवेशनात अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बहिणींना २१००₹ देण्यासाठी सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याचे सांगितले आहे.योग्य परिस्थिती आल्यावर नक्कीच २१००₹ देऊ असे सांगितले असले तरी दिवसेंदिवस राज्यावरील आणि राष्ट्रवरील कर्जाचा डोंगर वाढतच असून योग्य वेळ कधी येईल हे सांगणे फारच कठीण आहे.
योग्य वेळेसाठी आम्ही नवीन पर्याय शोधत असून दर महिन्याला १५००₹ बहिणींना कसे मिळतील यासाठी आर्थिक तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री बोलतात आणि इतर कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नसल्याचे ओरडून सांगत असले तरी शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन योजनाना शासनाने कात्री लावली आहे.लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी सरसकट १५००₹ देण्यात आले होते पण आता सर्व पेपर्स तपासूनच पात्र बहिणींनी पैसे मिळणार असल्याचे मंत्री सांगत आहेत यामुळे बहिणी कमालीच्या नाराज झाल्या असून आमचा वापर केवळ निवडणुकी साठी केला असल्याची आरडाओरड करीत आहेत.इतर राज्यात देखील निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने लाडकी बहीण प्रयोग यशस्वी करून सत्ता स्थापन केली होती आणि निवडून आल्यावर काही महिन्यातच योजना बंद केली.
दिल्लीत देखील प्रत्येक महिन्याला २५००₹ महिलाना भाजप देणार असल्याचे सांगत आहे. महाराष्ट्रात १५००₹ आम्हाला महिन्याच्या एक तारखेला मिळायला हवेत पण सध्या २० ते २२ तारीख उलटून गेली तरी पैसे खात्यात जमा होत नसल्याचे बहिणींचे म्हणणे आहे.
गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व