शिवसेना ऊ्ध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर
जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन महाराष्ट्र शासनाने दरमहा २१००/- रू चे अनुदान देण्या बाबत केलेल्या फसव्या घोषणे संदर्भात महिला आघाडीने विचार ला जाब...
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे थकीत अनुदान त्वरीत मिळावे तसेच महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमुद केले प्रमाणे दरमहा 2100/- रूपये चे अऩुदान लाडक्या बहिणी ना तातडीने लागु करावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना ऊ्ध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
उपनेत्या अस्मिता सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा महिला आघाडी ने , सोलापूर जिल्हा अधिकारी यांचे दालन ठोठावले. शिवसेना जिंदाबाद... ""निवडणूकीत केवळ मतदाना पुरती गॅरंटी.. सत्तेवर आल्यानंतर मात्र कोलांटी ""असली कुट निती बंद करा नाहीतर खुर्ची खाली करा.., लाडक्या बहिणीना दरमहा रू २१००/- चे अनुदान मिळालेच पाहिजे.....आशा घोषणानी परिसर महीलानी दणाणून सोडला.
यावेळी महिला आघाडीने जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून महिलाच्या प्रश्नावर , लाडकी बहिण योजनेच्या अनुदानातील अडचणींवर महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांचेशी चर्चा करून जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचेकडे लेखी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा रुपये १५००/- इतके अनुदान देण्यात येते तथापि या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारची नियमितता नसून सदरचे अनुदान महिलांना नियमित शाश्वतपणे प्राप्त होत नाही. याशिवाय अनेक महिलांना वेगवेगळे निकष लावून अनुदानापासून वंचीत ठेवण्यात आले आहे. राज्यभरात सध्या २ कोटी 53 लाख इतक्या लाडक्या बहिणी अनुदानास पात्र आहेत.
सध्याच्या महायुती सरकारने निवडणुकीमध्ये दरमहा २१००/- इतके अनुदान देण्याची घोषणा निवडणूकीच्या जाहीरनाम्यात केली होती. परंतु अद्याप त्याचा अंमल प्रत्यक्षात सुरू झालेला नाही. देवा भाऊ, दादा व मिंंदे यांनी लाडक्या बहिणीना दिलेली गॅरंन्टी हवेत जिरली आहे. केवळ निवडणूकीपुरती गॅरंटी, सत्तेवर आल्यानंतर मात्र कोलांटी, अशी कुट निती भाजपा प्रणित महायुती सरकार राबवत आहे.
वास्तविक हे सरकार केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करून मोकळे होत आहे परंतु प्रत्यक्षात महिला सक्षमीकरण व सुरक्षितता याकडे पूर्णता दुर्लक्ष करत आहे. राज्यात दररोज किमान 70 महिला बेपत्ता होत आहेत. याची अनेक कारणे आहेत यावर शासन कोठेही गांभीर विचार करताना दिसत नाही. महिला वरील अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत यामध्ये महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा मूद्दा आहे .शासन केवळ कागदोपत्री योजना जाहीर करीत आले आहे, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी काटेकोरपणे करताना कोठेही दिसत नाही. नुकतेच महायुती सरकारने आपला अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पात देखील केवळ 36000 कोटी इतकी इतकी तुटपुंजी तरतूद लाडकी बहिण योजने करिता करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन हे महिलांच्या हितासाठी व संरक्षणासाठी गंभीर असल्याचे कोठेही दिसून येत नाही , त्यामुळे महिलांचे मनोबल दिवसेंदिवस खचत आहे असुरक्षितेचे वातावरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातून अनेक ठिकाणी महिला मध्ये संतापाची व उद्रेकाची भावना वाढत आहे .
तरी राज्य शासनाने तातडीने निवडणुकीत घोषणा केल्याप्रमाणे दरमहा रू.२१००/- प्रमाणे लाडक्या बहिणीचे अनुदान लागू करावे अन्यथा शिवसेना महिला आघाडी पुन्हा तीव्र आंदोलन करून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.अशी मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी महिलाचा संताप दिसून आला. महिला आघाडी घ्या लोकसभा क्षेत्र प्रमुख शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटक प्रिती नायर , स्वाती रूपनर, उपजिल्हा संघटक ज्योती माळवदकर, गीता मदन, श्री देवी बगले, .मीनाक्षी गवळी, मिना सुरवसे, जोहरा रंगरेज, सुनिता लोंढे, सुनंदा शिरूर , नांगमणी भंडारी , दिपाली पवार , आशाबाई कदम, शहनाज गायकवाड आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
समस्त शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्हा