छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विशेष लेख आपल्या तेज न्यूज परिवाराकडून
माझ्या राजाला जाणून समजून घ्यायचा दिवस
माझ्या राजांनी 395 वर्षांनंतर ही लोकांच्या हृदयात घट्ट स्थान मिळवले आहे.हे घट्ट स्थान का मिळवले हे जाणून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणे गरजेचे आहे.माझ्या राजाला व राजाच्या कार्याला विद्यार्थी दशेत जाणून घेऊन त्यांचे गुण अंगी घेणे काळाची गरज झाली आहे.
मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून कोणते गुण घेणे गरजेचे आहे... प्रथम शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना त्यांनी ज्या ज्या किल्यांसाठी मावळ्यांच्या प्राणांची आहुती दिल्या. अशा गड किल्ल्यांना भेटी देऊन..त्या गडकिल्ल्यांची सध्याची परिस्थिती लोकांसमोर व महाराजांच्या नावाने राजकीय पोळी भाजून स्वतः च्या विचारांची टिमकी वाजवतात... त्यांना गडकिल्ले मोहीम करून गडकिल्ल्यांची डागडुजी करून पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करावे... अथवा जाब विचारावा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना मी व आपण काय जाणून घेणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले तेव्हा सभोवताली मोगली सत्तेने थैमान घातले होते.ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी काय केले हे सजवून घ्यायचा दिवस.....डी.जे.किंवा पोकळ राजकीय भाषणे ऐकून मन दुषित करण्याचा दिवस नव्हे.
लहान वयातच खूप मोठी स्वप्ने पाहत..... असताना सर्वप्रथम मावळे जमा करायला सुरुवात केली.कमी वयात मोठी स्वप्ने पाहिल्याने त्यांनी विश्वासू सहकारी व काटेकोर नियोजन केले.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वतः च्या स्वराज्याची राजधानी निर्माण केली.हे सर्व करत असताना वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांचा विश्वास संपादन केला.त्यासाठी कठोर मेहनत घेतली.आपले कार्य सिद्धीस घेऊन जाण्यासाठी क्षणाक्षणाचे नियोजन त्यांनी केले.सतत परिश्रम घेतले.गणिमी काव्याची निती स्वतः बरोबर आपल्या विश्वासू सर्व धार्मिक व जातीच्या मावळ्यांना समजून सांगितली.
कठोर नियम करून स्वराज्यात समान न्याय दिला.सामान्य प्रजा,शेतकरी, व्यापाऱ्यांना कोणी त्रास दिला तर त्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली.स्वत: बरोबर सर्वांना नियमांच्या बंधनामध्ये बांधिल ठेवले.
दूरदृष्टी ठेवून अनेक योजनांची आखणी ते अगोदरच करत होते... त्यामुळे ऐण वेळेस त्यांना कधीही अडचणींचा किंवा दगाफटक्याचा सामना करावा लागला नाही.अपवाद घरभेदी...
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते स्वतः चारित्र्यसंपन्न राहिले.शिवाय विरोधी साम्राज्यातील स्त्रियांना त्यांनी कधीच अपमानित केले नाही.
आर्थिक शिस्त कडक होती.
शिवाय प्रजेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते.... लोक ही जिवाला जीव द्यायला कधीच मागेपुढे पाहत नव्हते.उदा.तानाजी मालुसरे,जिवा महाला,वीर शिवा काशिद
395 वी जयंती साजरी करताना मोठी स्वप्ने पहा, कठोर परिश्रम करा.. विश्वासू सहकारी निर्माण करा... जात धर्म भेदभाव करू नका, आर्थिक शिस्त ठेवा... चारित्र्यसंपन्न रहा... सत्ता व पैशाचा माज दाखवू नका... सत्ता ही जनहिताची कामे करण्यासाठी असते लक्षात ठेवा.. चुकला त्याला कठोर शासन करण्यास मागेपुढे पाहू नका..( जात धर्म.. शेजारी पाजारी... नातेवाईक असा भेदाभेद करू नका.)
राजांना समजून राष्ट्रीय हिताचे एक तरी काम मी करेन ही भीष्म प्रतिज्ञा करावी....
प्रा.आनंदा आलदर ✒️ 9765066247