शिक्षणाची ऐसी तैसी. विशेष लेख
98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे भरले आहे.त्याच्या अध्यक्षा श्रीमती तारा भवाळकार आहेत.त्यांनी शिक्षणाबद्दल व्यक्त केलेली भिती खरंच महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखी आहे.स्टेटवर कोण होते..व कोण येऊन गेले याचा मुजाहिजा न ठेवता सत्य स्थिती तुमच्या वाणीतून बाहेर आली त्याबद्दल धन्यवाद... हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचलेली मानसं परिवर्तनासाठी स्वतःचा देह ही झिजवतात हे त्रिकालाबाधित सत्य असते हे संपूर्ण देशाला कळून आले.
शाळा, विद्यार्थी, शिक्षक , समाज व शासन प्रशान याबद्दल रोखठोक मत साहित्य संमेलनात मांडणाऱ्या महाराष्ट्राच्या आईचा भास तुमच्या मध्ये आला.आई ही नेहमीच चांगल्याच्या बाजूने उभे असते.तसे तुम्ही महाराष्ट्रातील मराठी शाळा व शिक्षकांच्या बाजूने उभे राहून सत्य परिस्थिती मांडण्याचे धारिष्ट्य फक्त आईच करू शकते हे पुन्हा एकदा दाखवून दिले.परंतू हा बदल स्विकारायला धाडसी मानसं जन्माला येणे महाराष्ट्राची गरज आहे.आज तरी असे धाडसी निर्णय घेणारी लोकं महाराष्ट्राच्या राजकारणात व प्रशासनात कमी प्रमाणात दिसतात.शिक्षणाचे व्यापारीकरण करून शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला व त्याची घडी बसविण्यासाठी निधड्या छातीची व स्वतः चा निर्णय परिवर्तनासाठी घेणारी माणसं जन्माला घेणे गरजेचे आहे.
*आज प्रत्येक ठिकाणी शिक्षकाचे हात कायद्याने बांधून शिक्षण रसातळाला नेण्याचा डाव तरी मांडला नसेल का असे सामान्य मानसाला वाटू लागले आहे.*
NEP 2020 नुसार शिक्षणात आमूलाग्र बदल होणार आहे.हे खरे आहे... शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण ही सुरू झाले आहेत.पण खरं त्या धोरणानुसार शाळेच्या पायाभूत सुविधा बदलल्या आहेत. हाच एक संशोधनाचा विषय आहे.शिक्षणात AI प्रणाली विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.परंतू ते हाताळण्यासाठी मनुष्यबळ विकास झाला आहे का..?
आजही शाळांना अनुदान व्यवस्थित दिले जात नाही.शिक्षकांच्या नेमणूका, त्यांना पगार मिळतो का..? प्राथमिक शिक्षणाची निगा व्यवस्थित राखली जाते का..? शाळांना इमारती, क्रीडासंबंधी साहित्य व क्रीडांगण आहेत का ? शाळा तिथे चांगले ग्रंथालयं आहे का..? ग्रंथालय असेल तर विद्यार्थ्यांच्या विचारांना वाव देणारे ग्रंथ उपलब्ध आहेत का..? चांगलं पाणी मिळते का ? विद्यार्थी संख्या पाहून तेथे स्वच्छतागृहे आहेत का..? स्वच्छतागृहांची निगा आहे का..? वर्ग व्यवस्था जागतिक दर्जाचे शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून केली आहे का..? मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध आहेत का..? भयमुक्त शिक्षण आहे का..? मुलांच्या मनामध्ये गरीब व श्रीमंत न्यूनगंड कमी करण्यासाठी कोणती व्यवस्था निर्माण केली..? अनेक हुशार मुलांचे आर्थिक स्थिती मुळे अर्धवट शिक्षण होते ..यांच्या साठी भरीव आर्थिक तरतूद होते का..? थोड्या प्रमाणात लक्ष वेधले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..... खेदाने सांगावे लागते.... आपल्या आईला 98 व्या साहित्य संमेलनात शिक्षणावर, शिक्षकांवर व शिक्षणाच्या पायाभूत सुविधावर चिंता व्यक्त करावी लागते....हे खरे दुर्दैव आहे....मग मनाला वाटते .... खरंच महाराष्ट्र शैक्षणिक बाबतीत प्रगतीशील होतो आहे की अधोगतीकडे चालला आहे....
प्रा.आनंदा आलदर ✒️9765066247