वेळापूर प्रतिनिधी तेज न्यूज
माळशिरस तालुक्यातील मळोली गावातील शेतकरी पत्रकार जयराम राजाराम घाडगे यांच्या मालकी हक्काचे जमिनीत 265 वाणाचा ऊस होता. त्याचबरोबर त्यासाठी पाणी देण्यासाठी लागणारे कोठारी कंपनीची ड्रीप,तसेच कोठारी कंपनीच्या सात दोन इंची पाईप आगीत जळून भस्मसात झाल्या.
लोकांच्या सतर्कतेमुळे बाकीच्या दोन एकर ऊस व त्यातील ड्रीप जळण्यापासून वाचवला गेला. हा प्रकार घाडगे वस्ती डी पी या ठिकाणी झाडावरती तारा एकमेकांना घर्षण झाल्यामुळे घडला.
एम एस सी बी ला वारंवार तक्रार करून त्या झाडाची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही.. तरी या प्रकारात दोषी कोण, आणि याचे नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न पडला आहे.
एम एस ई बी कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्या ठिकाणी कोणीही कर्मचारी आलेला नाही, कोणीही दखल घेतलेली नाही तर असा हाता तोंडाला आलेला ऊस जळून गेल्यानंतर शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल. याचे गांभीर्य कोण घेणार की नाही.
याबाबत एम एस ई बी कर्मचारी वर्गाने पचंनामा करून पुढील कार्यवाही करावी अशी शेतकरी मागणी करीत आहेत.