पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसाठी सध्या पाण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांचे पाण्याचे स्रोत कमी पडू लागल्याने हातातोंडाशी आलेली पिके नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे रानातील बोअरचे पाणी कमी झाल्याने उभ्या पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे अश्या वेळी उजनी जलाशयातून कॅनाल मध्ये त्वरित पाणी सोडणे गरजेचे झाले आहे
सध्या उजनीतून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून हे पाणी सोडण्यात येत असले तरीही रानातील उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याचे कनाॅल मध्येही पाणी सोडणे तितकेच गरजेचे आहे. याचा विचार करून शासनाने त्वरित पाणी सोडावे अशी मागणी पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.