फोटो सौजन्य:- साई डिजिटल रुपेश सदावर्ते
यामुलांच्या पुस्तकी ज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडेही तितकेच महत्वाचे आहेत
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा उत्सव निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या नारदीय कीर्तनाच्या पहिल्या पुष्प गुंफताना कैलास बुवा खरे यांनी निरुपणात सांगितले.
सुरुवातीला श्री चौंडेश्वरी मातेची पूजा आणि दीपप्रज्वलन कैलास बुवा खरे.गंगाधर देव मिलिंद उकरंडे.संतोष पिंपळे.विजय भागवत जगन्नाथ दुधाणे अशोक म्हेत्रे.संतोष टकले.संतोष भोसले.मोहन बोधे.होनवले गुरुजी ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले आणि कीर्तनाला सुरुवात झाली.
सुरुवातीला पूर्वरंगामध्ये देवी म्हैशासूर मर्दीनी देवी तू या पदावर निरुपण करत देवीच महात्म्य अतिशय सुंदर सांगत म्हैशासूर राक्षस आणि रक्त बीजाचा वध देवीनं कसा केला.याचे अतिशय सुंदर वर्णन दृष्टांत देत माणसाने गंगेत स्नान केलं म्हणजे सगळी पापे नाहीशी होतील परंतु पाप करण्याची वासना नाहीशी होणार नाही. सांगत नामस्मरण करुन नुसतं चालणार नाही संकट आले तर खंबीरपणे उभे राहता आलं पाहिजे.त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सांगितले.दे रे हरी पलंगावरी असं होतं नसतं.सध्याच्या काळात सहा ते दहा वेळात नुसत्या मालिका पाहून आनंद मानणाऱ्या महिला पाहिल्या की कुठ माता जिजाऊ.कुठे अहिल्याबाई होळकर.कुठे झाशीची राणी.... यांनी दिलेल्या मार्गावर जाण्याचा थोडातरी प्रयत्न करा म्हणजे शिवबासारखी संतती जन्माला येईल.त्यासाठी संस्कार खुप महत्वाचे आहेत ते संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर केले.चितोड गडावरची राणी पद्मिनी ने स्वतःचा देह आगीत ढकलून दिल्या मुळे शत्रूंची निराशा करता आली शत्रुचा पाडाव नव्हे.म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करणं अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.त्यासाठी उपासनेने सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना आवश्यक आहे.यासाठी भगवंताचे अधिष्ठान आवश्यक आहे.उत्तररंगात याचाच आधार घेत पंडीत कालीदासाचे आख्यान अतिशय सुंदर सादर करत जर आपण आपल्या ज्ञानाचा घमेंडखोर पध्दतीने वापर करत अन्याय केला.आपण आपल्या पत्नीला त्रास दिला तर त्याचा तळतळाट विनाशास कसा कारणीभूत ठरतो यांचे सुंदर उदाहरण कालीदास असून सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या विनाशाच कारणीभूत ठरतो अतिशय सुंदर कथा सांगत करकंबकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.
त्यांना तितकीच सुंदर आणि दमदार साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम गंगाधर देव टाळ माऊली पिसे यांनी करत कीर्तनाला अधिक रंग भरला.अतिशय गायनाची उत्तम तयारी अभ्यासपूर्ण निरुपण गाढा अभ्यास कैलास बुवा खरे यांचा दिसून आले.यावेळी पहिला दिवस असून सुद्धा करकंबकर रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सहा दिवस चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व कोष्टी समाज बांधव मोठ्या संख्येने अधिक परिश्रम घेत आहेत.
फोटो सौजन्य:- साई डिजिटल रुपेश सदावर्ते