भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतचे सरपंच रणजीत नानासो जाधव यांची राष्ट्रीय सरपंच संसदेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
यावेळी एमआयटी, पुणे' शिक्षणसंस्थासमूहाचे कार्यकारी अध्यक्ष व 'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट' चे प्रणेते राहुल कराड यांच्या संकल्पनेतून 'भारतीय छात्र संसद', 'राष्ट्रीय महिला परिषद', 'राष्ट्रीय शिक्षक काँग्रेस' आणि 'राष्ट्रीय सरपंच संसदे' ची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी रणजीत जाधव म्हणाले की वरिष्ठ जो आदेश देतील त्याप्रमाणे तालुक्यातील सर्व सरपंच यांना सोबत घेऊन मी कार्य करणार आहे.गावाच्या विकासाचा विचार करून सर्वांना मान्य होणार निर्णय घेतला जाईल.असे हि जाधव यांनी सांगितले.
या निवडी बद्दल वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चेअरमन कल्याणराव काळे,संचालक सुनील पाटील,ग्राम.सदस्य,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.