दहशतीचा खलबत्ता
जंगली प्राण्यांचे अस्तित्व ते किती कणखर व किती शक्तीशाली आहेत यावर अवलंबून असते.असेच मानवी जंगलातील प्राणी सुध्दा आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वतः च्या खानदानीला संपवायला मागेपुढे पाहत नाहीत.
महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांच्या हत्या झाल्या आहेत.अश्याच हत्या होतं राहतील ही.... मोजक्याच हत्याचे राजकीय भांडवल करून अजून अशा हत्या घडवून आणून राजकीय वग वटविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातात.पण न्याय कधी कोणाला मिळत नाही.काही दिवसानंतर गढूळ झालेले पाणी...काचेसारखे वाहू लागले...
महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघाचा प्रामाणिक सर्वे लोकांमध्ये जाऊन मिडियाने Live व गुप्त केला तर कोण जनतेसाठी कोण सत्तेसाठी सत्तेसाठी कोणत्या थरावर जाऊन राजकारण करतात हे कळेल.आरोप करून राजकीय धुळवड साजरी करणाऱ्या स्वतः ला अंतर्गत निरखून पाहिले तर... दोन्ही बाजूंच्या हातावरील रंग सारखेच पाहायला मिळतील.*कोणतेही हत्या किंवा हत्याकांड घडून येते ते माणुसकीला काळीमा फासणारी घटना व निषेध करावी अशीच घटना असते.*
महाराष्ट्रात अनेक हत्या व हत्याकांड झाले आहेत...त्यात न्यायाची टक्केवारी किती असेल हे पण तपासण्याची गरज आहे.हत्या व हत्याकांड गरीबांचे होवो या श्रीमंतांचे होवो... त्यांना समान न्याय द्यायचा प्रयत्न..त्या त्या वेळच्या गृहविभागाकडून झाला का याची श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे.तरच आरोप प्रत्यारोप... निघून प्रत्यक्ष न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होऊ शकतो.
राजकीय जंगलात जे पैसे व मनगटाने बलशाली आहेत.त्यांनी सामान्य माणसांना नेहमीच बटिक करून ठेवलेले आहे.राजकीय लोकांनी सर्व प्रकारच्या माफियांना हाताशी धरून राजकीय पुरूषत्व दाखविण्याचा प्रयत्न करतात.सत्ता, पैसा व दहशत निर्माण करून सामान्य लोकांना खलबत्त्यात कुठले जाते.
*ग्रामपंचायतीपासून ते राज्य व राष्ट्रीय स्तरावरील दहशतीच्या खलबत्त्याचा बिमोड करण्यासाठी एक धाडसी धोरण ठरविण्यासाठी हे राजकीय धुरंधर कधीच एकत्र येणार नाहीत.* कारण पडद्यामागे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या समर्थन असते.... दोन जाती व दोन धर्माचा निखारा लालबुंद तेवत ठेवून शेकण्याचे काम राजकीय मंडळी करीत असतात.बिनबुडाच्या आरोपांच्या फैरी झाडत राहायच्या...
लोकांची माथी भडकत ठेवायचे धंदे राजकीय लोकांकडून केले जातात.परंतू अशा हत्या व हत्याकांड पुन्हा होऊ नयेत म्हणून शाश्वत उपाय यांच्या कडून कधीच होणार नाहीत.
कारण साम, दाम,दंड व भेद या नितीचा वापर करण्यासाठी प्रत्येक राजकीय लोकांना प्रत्येक क्षेत्रातील लोक सांभाळावे लागतात.त्यामुळे गुन्हेगारी संपवून टाकण्यासाठी शाश्वत उपाय योजना कधीच तयार होणार नाहीत.
राजकीय लोकांनी स्वतः चे आत्मपरीक्षण करावे... महाराष्ट्रात झालेल्या हत्या,हत्याकांड,मारझोड, शिव्या,धमक्या व बेईज्जत किती व कोणाला केले याचे आत्मपरीक्षण करावे.
दहशतीचा खलबत्ता...यांचा सर्व राजकीय सज्जनांनी विचार करावा.
प्रा.आनंदा आलदर ✒️ 9765066247