महत्वकांक्षा व प्रामाणिकपणा यांचे संतुलन राखले तर आनंदी जीवन जगता येते : डॉ. एम. एस. देशपांडे
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सकारात्मकता यश आणि सहनशक्तीचा आधार आहे. आव्हानांमध्ये संधी शोधण्याची क्षमता आपल्याला यशाची दिशा देत सकारात्मक दृष्टीकोन आत्मसात करण्यासाठी नेहमी ध्येयवादी बनविते. व्यावसायीक आणि वैयक्तिक जीवनात महत्वकांक्षा आणि प्रामाणिकपणाचे संतुलन राखले तर आनंदी जीवन जगता येत असल्याचे प्रतिपादन सॉप्ट स्कील सोल्यूशन्स सोलापूरचे एसीई डॉ.एम.एस.देशपांडे यांनी केले.
पंढरपूर सिंहगडमध्ये " सकारात्मक वृत्ती व व्यक्तिमत्व विकास" या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ.एम.एस.देशपांडे, मा. नानासाहेब साठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जे.करांडे आणि उपप्राचार्य डॉ.एस.जी. कुलकर्णी तसेच कार्यक्रमाचे संयोजक प्रा. एन.एम.सावंत, समन्वयक डॉ.के. शिवशंकर, प्रा.एम.एम.झाडे, प्रा.ओ.एन.ठिगळे आणि सहसमन्वयक प्रा.एल.डी.जोशी, प्रा.एम.व्ही.नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नानासाहेब साठे यांनी मानवी मन अमर्यादित आहे,असिम आहे,अनंत आहे. विचार ही मनुष्याला दिलेली अमूल्य देणगी आहे.मनातील नकारात्मकता सोडून जर विचारात सकारात्मकता असेल जीवन सुखकर होईल.सकारात्मक मनोभाव हाच सदैव आनंदी राहण्याचा मार्ग आहे. जीवन निरोगी राहण्यासाठी शुध्द सकस आहार घ्या, भरपूर खेळा,भरपूर हसा, मेडीटेशन करा सर्व टेन्शन दूर होऊन मन तजेलदार राहून आनंदी व्हाल. अशा विविध प्रकारच्या माध्यमातून प्रात्यक्षिकामार्फत मनाविषयी व आरोग्याविषयी प्रेरक असे मार्गदशन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व कर्मचारी खूपच प्रेरीत झाले.
सदरील कार्यक्रमात विभाग प्रमुख डॉ.एस. एस.कुलकर्णी,डॉ.अल्ताफ मुलाणी, डॉ. बी. बी. गोडबोले, डॉ.सी.पी.पिसे,डॉ.एस. एस.कदम,डॉ.के.शिवशंकर,डॉ.एस.व्ही. पिंगळे,डॉ.एस.जी.देशमुख, डॉ.ए.आय. निकम या कार्यक्रमाचे संयोजक प्रा.एन.एम. सावंत,समन्वयक डॉ.के.शिवशंकर, प्रा.एम. एम.झाडे, प्रा.ओ.एन.ठिगळे, आणि सहसमन्वयक प्रा.एल.डी.जोशी, प्रा.एम.व्ही. नाईकनवरे यांनी विशेष हातभार लावला तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.