युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असलेला विठूराया आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतो
करकंब प्रतीनीधी तेज न्यूज
श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवाच्या शेवटच्या पुष्पा मध्ये सांगितले सुरुवातीला श्री चौंडेश्वरी मातेची पूजा आणि दीपप्रज्वलन स्मिताताई आजेगांवकर गंगाधर देव.माऊली पिसे.मिलिंद उकरंडे.विजय भागवत.संतोष पिंपळे.केरबा भाजीभाकरे.संतोष टकले.कांतीलाल टकले.मोहन बोधे.ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते झाले.त्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली सुरुवातीला पूर्वरंगामध्ये आल्या संसारी होय जागा या संत दासगणू महाराज यांनी रचलेल्या पदावर निरुपण करताना सांगितले की मनुष्य देह एकदाच मिळतो आणि त्या जन्मात आपलं हित कशात हे जाणून घेणं आवश्यक आहे.भगवंताने आपल्याला इंद्रिय दिली असली तरी आपल्या पेक्षा अनेक प्राण्यांची इंद्रिय बलवान आहेत परंतु आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा बुध्दी मात्र मानवालाच मिळाली असून त्या बुध्दीचा वापर आपण पारमार्थिक साधनेत वापरून आणि ज्ञान प्राप्त करून आपण आपल्या आयुष्याचे सार्थक करावे.अनेक ग्रंथ पाठ केले पारायण करुन काही उपयोग होणार नाही मात्र ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्या प्रमाणे एक तरी ओवी अनुभवावी याप्रमाणे जीवन जगले पाहिजे.संत आपले सर्वस्व परमेश्वराला अपर्ण करतात पण मनुष्य मात्र सगळं अपर्ण करतो पण मीपणा मात्र आपल्याकडे ठेवतो.संत अपकार करण्याऱ्या वरही उपकार करतात सांगत उत्तररंगामध्ये खास रसिकांच्या आग्रहास्तव हीन कुळात जन्मून सुध्दा परमेश्वराच्या केलेल्या भक्तीमुळे संत कान्होपात्रांनी विठूरायाच्या ह्रदयात कसं स्थान मिळवलं यांचे सुंदर चरीत्र सांगत करकंबकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तितकीच सुंदर आणि समर्पक साथसंगत हार्मोनियम गंगाधर देव तबला ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली पिसे यांनी करत कीर्तनाला अधिक रंग भरला मध्यांतरात या कीर्तन महोत्सवात अधिक योगदान दिले.
त्यांचा सन्मान अध्यक्ष मिलिंद उकरंडे विजय भागवत संतोष पिंपळे यांचे शुभहस्ते करण्यात आला.संपूर्ण कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व कोष्टी समाजबांधवांनी मोलाचे परिश्रम घेत महोत्सव यशस्वी केला.यासाठी करकंब व करकंब पंचक्रोशीतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उदंड प्रतिसाद दिला