सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
२३ डिसेंबर पासून सोलापुरातून गोवा येथील फ्लाय ९१ या विमान कंपनीने सोलापूर ते गोवा सोलापूर ते मुंबई अशी विमान सेवा सुरू होईल अशी औपचारिक घोषणा केली होती व त्याचे दर व वेळापत्रक सुद्धा जाहीर केले होते.
नागरी उद्ययन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोलापुरात येऊन याची घोषणा केली होती परंतु ही केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी सोलापूरकरांची केलेली दिशाभूल होती.
सर्व सोलापूरकर सोलापुरातून यावर्षी तरी विमानसेवा सुरू होईल या आशेवर २३ डिसेंबरच्या विमानसेवेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते परंतु त्यांची घोर फसवणूक केल्यामुळे सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके व त्यांच्या कुटुंबीयांनी विमानाचे मॉडेल उडवून याचा जाहीर निषेध केला आहे.
विमान सेवा सुरू न करण्यात अपयशी ठरल्यामुळे केंद्रीय नागरी उदयन मंत्री कीनीजारापू नायडू , राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्याची नैतिक जबाबदारी घेऊन आपले राजीनामे द्यावेत अशा आशयाचे पत्र प्रधानमंत्री कार्यालय व इतर सर्वांना डॉ.संदीप आडके यांनी पाठवलेले आहे.