हिंदू मॅरेज ऍक्ट,कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, खावटी,महिला पुनर्वसन इत्यादी कायदे सुधारणे गरजेचे- डॉ जितीन वंजारे
अतुल सुभाष आत्महत्या म्हणजे येथील महिला शशक्तिकरण व संरक्षण कायद्यामुळे अभय असणाऱ्या मुजोर महिलांकडून झालेला निष्पाप खून होय- डॉ जितीन वंजारे
काल परवा एक प्रकरण घडलं ए आय प्रोफेशनल आय टी इंजिनीअर अतुल सुभाष ह्या दीड लाख पगार असणाऱ्या आय टी इंजिनीअर ने सुमारे चोवीस पाने आणि दीड तास विडिओ रेकॉर्डिंग करून स्वतःचा झालेला मानसिक शारीरिक कौटुंबिक आणि सामाजिक आर्थिक छळ जगासमोर मांडला. जिथे जाईल तेथून प्रताडना, हीन वागणूक,सगळ्यांनी मागीतलेले पैसे त्यामुळे स्वतःच्या बायकोकडून आणि तिच्या नातेवाईकांकडून झालेला त्रास, कोर्टात झालेली पिळवणूक, दोन वर्षात सुमारे एकशे वीस वेळा कोर्टाच्या फेऱ्या मारून स्वतःला झालेला मानसिक,शारीरिक, कौटुंबिक आर्थिक त्रास त्यातून कंटाळून शेवटी केलेली आत्महत्या हे अतिशय भयावह आहे. वास्तव जगातील पुरुषांचा छळ कश्या प्रकारे होतो, महिलांकडून स्वतः कमावती असूनही कश्याप्रकारे करोडो रुपयाची मागणी केली जाते, पुरुषांना किती संघर्ष आहे त्यांना लग्नानंतर किती त्रास दिला जातो, एक प्रकारची खंडणी मागितल्यागत व्याजाचे पैसे मागितल्यागत त्याच्याकडून पोटगी मागितली जाते, त्याला त्याच्या आई वडिलांपासून अगोदर तोडलं जातं एकटं पाडलं जातं आणि नंतर पैसा, सेक्स, हीन वागणूक, बदनामी करून त्याला कंगाल केल जातं ते पण कायज्ञान्वये? कीती खोटेपणा? किती वाईट गोष्ट आहे त्याचच खायचं, त्यालाच दोष द्यायचा, त्याच्यावरच उलटायचं आणि अग्रीम पैसे कोर्टाकडून मागून त्याच पैशावर त्यालाच जेल मध्ये खेचायचं, लुटायचं... वारे स्री प्रधान कायदे संस्कृती. हे आता बदलल पाहिजे कायदा निर्माण करताना ची स्री ही अबला होती ती चूल आणि मूल ह्यापलीकडे गेली नव्हती आणि म्हणून तिला कायज्ञान्वये संरक्षण देण गरजेचं होत. तीच पुनर्वसन होणं गरजेचं होत पण आजकाल महिला लग्न करतात, वाईट वागतात, इतर बाहेरचे संबंध ठेवतात पुरुषांना त्रास देतात उघड यायचा आकार दिसला की कोर्टात खोटे आरोप करून पतीला जेल मध्ये पाठवतात कौटुंबिक हिंसाचार, पोटगी, हुंडा बळी, खावटी, अग्रीम पोटगी इत्यादी च्या नावाखाली भरमसाठ पैशाची मागणी केली जाते. पतीला बदनाम करून त्याला मानसिक आर्थिक त्रास देऊन दुसऱ्या सोबत आनंदात राहतात. म्हणजे पहिल्याचा पैसा लुटायचा दुसऱ्याची साथ करायची आणि अडल्टरी करून चार पाच पर पूरुषांशी संबंध ठेऊन त्याची साथ घेऊन एखाद्या चांगल्या पुरुषाला बदनाम करायचं त्याची पूर्ण लाईफ बरबाद करायची हे आजकाल सर्रासपणे घडू लागलं आहे. बऱ्याच स्रिया लग्न करून आईच बहिणीचं किंवा भावाचं ऐकून संसार मोडवतात आयुष्यभर पायपुसन म्हणून भावाची लेकरं सांभाळून शिळ्या तुकड्यावर गुलामी करतात. किंवा नवऱ्याचा पैसा लुटून माहेरच्यांचं भलं करतात स्वतःचा संसार मोडवतात. ह्याला जबाबदार मुलींचे नातेवाईक आहेत. ज्या मुलीची आई मुलीच्या संसारात धवळाढवळ करते, तिला नेहमी माहेरी बोलावते, फोनवर कॉल वर बहीण आई भाऊ नेहमी दिवसातून चार पाच घंटे आग लावते त्या मुलीचा संसार कडेला जातं नाही. दिल्या घरी सुखी रहा ही वृत्ती पाळली तर आणि तरच संसार कडेला जातो नसता सर्वे नुसार मुलींचे संसार मोडन्या मागे मुलीची आई, बहीण जास्त जबाबदार असल्याच दिसून आलं आहे.
काल परवा अतुल सुभाष नावाच्या इंजिनिअर ने फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याला त्याच्या पत्नीने भयंकर त्रास दिला तीन करोड रुपये अंतिम पोटगी मागितली आणि दोन लाख रुपये प्रति महिना आंतरिम भत्ता मागितला, त्याच्यावर वेगवेगळ्या नऊ केसेस दाखल केल्या, त्याला व त्याच्या कुटुंबियांना जेल ची हवा दाखवली, प्रचंड त्रास दिला. स्वतः पत्नी निकिता सिंघानिया इंजिनियर आहे तीपण पैसे कमावते आहे तिला साठ हजार रुपये पगार आहे आन ती कायद्याचा धाक दाखवून कोटी रुपये मागते आहे किती वाईट गोष्ट आहे. हे नक्कीच दुर्दैवी आहे. आजकाल 498 केस आली की कोर्टात वकील स्वतःच कमिशन ठरवून घेतो समोरच्या पतीचा हुद्दा विचारला जातो त्याची प्रॉपर्टी, त्याच पद प्रतिष्ठा आणि नौकरी पाहून पैसेवाला दिसला की मुलींकडून एकही रुपया न घेता तिची केस कमिशन ठरवून फ्री मध्ये लढवली जाते, पतीला त्रास देऊन पतीकडून मिळालेल्या पैशात कमिशन ठरवून केस फायनल पर्यंत फुकट लढवली जाते,कोर्ट वकील अगदी सगळ्यांना मॅनेज करून त्यांचा सगल्याचा पैसे पोषणकर्ता फक्त पतीच असतो. त्यामुळे महिलाप्रणित कायद्यात बदल करण गरजेचं आहे. महिलाप्रधान कायदे सुधारणा करून पुरुष आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचा शारीरिक मानसिक आर्थिक छळ रोखण्याच्या दृष्टीने कायदेविषयक पुरुष हिताचे धोरन आखले पाहिजे नसता स्त्री पीडित पुरुषांचे हाल बेहाल होऊन रोज अनेक पत्नी पीडिताची आत्महत्या असेलेली बातमी वाचायला मिळेल.
*काय केल पाहिजे?* - 1)कायद्यात बदल केला पाहिजे. कोर्टात पुरुषांना आधार देणारा कायदाच नाही. स्रियांची पर पुरुष संबंध adultary सिद्ध करता येत नाही कारण तो इज्जतीचा प्रश्न असतो कोर्टापर्यंत तो आणला जाऊ शकत नाही त्यात अनेक स्त्री पुरुष गलत मार्गाने जातात आणि संसार तुटतात. त्यामुळे आपापसात थोड्या फार पैशाची देवाणघेवाण करून फारकत घेतलेली बरी. कोर्टाचे निकाल लवकर लावून घेतले पाहिजेत. फॅमिली कोर्ट फास्ट ट्रॅक वर चालले पाहिजेत. कारण चार पाच वर्ष केस चालवून खर्च ताण तणाव आणि नैराश्य येऊन बरेच लोक आत्महत्या करतात.
2)पती-पत्नी दोघांच्याही नातेवाईकानी त्यांच्या संसारात बारबार टोकू नये-शक्यतो संसार पती पत्नी मुळे तुटत नाहीत तर त्यांच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे ते तुटतात. सर्रास हेच पाहिलं गेलय की स्वतः मुलीच्या आई मुळेच मुलीच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. मुलीच्या संसारात आईने हस्तक्षेप केला की संसार मोडलाच म्हणा. आणि म्हणून मुलीच्या आईने मुलीच्या संसारात हस्तक्षेप करू नये. मुलाच्या आईने आणि बहिणीने पण ह्यात जास्त लक्ष घालू नये.बैठक टाकून कोणाची चूक कोणाचं बरोबर पाहून थोरा मोठ्यांनी समजून घेऊन समजून सांगून दोघांचा संसार सांभाळून द्यावा. आपसी संबंध जुडवावेत.
3)कोर्ट कचेरीत जाण्या अगोदर पती पत्नीला समुपदेशन महत्वाचे- दोघांनाही समजून सांगून त्यांचे योग्य समूपदेशन करणे गरजेचे आहे. त्यांना समजून सांगून आपशी वाद विवाद संपुष्टात आणावेत. नवीन संसाराला लागलेली पोरं भांडतात, आकसतात, त्यांचं बनत नाही वैचारिक मतभेद असतात त्यांना जुळवून घ्याला तब्बल सात वर्ष लागतात त्यामुळे दोन्ही कडील माता पिता नातेवाईकांनी बैठक टाकून वाद विवाद मिटवायला पाहिजेत. किंवा गावातील तंटामुक्ती, अशा वर्कर ताई, पोलीस विशेष सुरक्षा महिला पथक यांच्या सल्ल्याने त्याचा संसार मोडणार नाही अशी काळजी घेणं गरजेचं आहे.
4)कोर्टातील समुपदेशन महत्वाचे आणि फिक्स रक्कम मुलांच्या नावे जमा करावी - जज कडून दोघांनाही समोर घेऊन कुटुंब तुटणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या मुलांचे होणारे हाल समजून सांगितले पाहिजेत,विभक्त पती पत्नी झालेल्या मुलांच्या मनावर होणारे आघात, त्यांच पालकत्व घेण्यावरून होणारे वाद समजून सांगून दोघांचाही एकत्र येण्यात फायदा आहे हे समजून सांगितलं पाहिजे. नसता दोघांचीही मिळून विशिष्ट रक्कम मुलांच्या नावाने फिक्स रक्कम डिपॉझिट करायला पाहिजे आज काल ती फक्त पतीकडूनच वसुल केली जाते. ते चुकीचं आहे मुलीकडूनही विशिष्ट रक्कम घेतली गेली पाहिजे जर ती कमावती असेल तर.
5)कमावत्या पत्नीला पोटगी घेण्याचा अधिकार नसावा, मुलांची सर्वस्वी जबाबदारी पुरुषांची असावी - पोटगी च्या नावे करोडो लाखो पती कडून घेतले जातात, आंतरिम पोरगी, खावटी वसुल केली जाते त्यात मुलगी सबला असूनही कामावती असूनही मुलांकडूनच पोटगी का घ्यावी? ती बंद करा महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे मग त्या आता अबला नाहीत त्या सबला आहेत कमावत्या आहेत तर त्यांना पोटगी घेण्याचा अधिकार नसावा.होणाऱ्या अपत्याची सर्वस्वी जबाबदारी पतीची असली पाहिजे.पोटगी केस पूर्ण झाल्याशिवाय देऊ घेऊ नये कारण आंतरिम पोटगी घेऊन तोच पैसा वापरून पुरुषांना परेशान केल जातंय.
6)सामाजिक जणजागृती, समाजमाध्यम, कुटुंब कल्याण निधी वापरून जनजागृती चे कार्यक्रम घेतले पाहिजेत. विशिष्ट निधी त्याला वर्ग केला पाहिजे.कुटुंब कल्याण, पती पत्नी संबंध सुधारणा केंद्र,समूपदेशन केंद्र उभारली पाहिजेत तेथे तज्ज्ञ लोक नियुक्त केले पाहिजेत. कुटुंब तुटू नये ह्याची काळजी घेतली पाहिजे.
हिंदू मॅरेज कायदा, मुस्लिम पर्सनल कायदा, सर्व धर्मातील धर्मगुरु,समाजातील सामाजिक कार्यकर्ते, नेते यांनी पुरुषांवरील लग्न झाल्यानंतर होणाऱ्या आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रासावर विचार करायला हवा. मुली एक सोडून दहा जाणासोबत लग्न करतात पैसे उकळून दलाल लोक लग्न लावतात, मॅट्रिमोनी साईट लग्न लावतात पण ते लग्न टिकत नाहीत. आजकाल डिवोर्स करून पैसे लुटण्याचे काही स्रियांचे धंदे झाले आहेत, मूळ अनाथ होत आहेत, दोघा पती पत्नी च्या भांडणात मुलांची पिळवणूक होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्यासाठी आपण सर्वांनी काम केल पाहिजे.
लेखक
डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर