पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज नंदकुमार देशपांडे
ग्राहक व नागरिक यांनी एखादी वस्तू खरेदी करताना पावतीचा आग्रह धरला पाहिजे कारण पावतीशिवाय कुठलीही तक्रार चालत नाही ज्या ठिकाणी पैसे घेऊन व्यवहार केला जातो त्या सर्वांना ग्राहक संरक्षण कायद्यानुसार पावती देणे बंधनकारक आहे आणि पावती घेणे हा नागरिकांचा हक्क आहे याकरीता नागरिकांनी जागरूक राहून पावतीच्या आग्रह धरला पाहिजे प्रतिपादन सकील भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी केले.
26 डिसेंबर हा राज्यभर ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहक दिनाचे आयोजन तहसील कार्यालय पंढरपूर या ठिकाणी करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार लंगोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार देशपांडे हे होते.
प्रारंभी अखिल भारतीय ग्राहक पंचायत व सर्वांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन तहसीलदार सचिन लंगोटे , हिंदू कुमार देशपांडे तसेच सदस्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रारंभी ग्राहक दिनाबद्दल प्रास्ताविक आझाद अल्ला पुरकर यांनी केले.
नागरिकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायदा लागू झालेले ग्राहकाला त्याच्या काबद्दल जाणीव झाली असून त्याकरता नागरिकांनी एखादी वस्तू खरेदी करताना पावतीचा आग्रह करून घेतला पाहिजे वस्तू खरेदी केलेली त्याची पावती घेतली पाहिजे ही वस्तू खराब निघाल्यास बदलून घेण्याचा अधिकार ग्राहकास आहे तो ते दुकानदार नाकारू शकत नाही याकरता नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे असे नंदकुमार देशपांडे यांनी सांगितले. ग्राहक संरक्षण कायदा हे ग्राहकाचे कवच असून यामुळे ग्राहकाला फायदा मिळाला यापूर्वी ग्राहकाने एखादी वस्तू खरेदी केली तर त्याला तो बदलून मिळण्याचा अधिकार नव्हता परंतु नागरिकांसाठी ग्राहकांसाठी करण्यात आलेल्या कायद्यामुळे व्यक्तीला आधार मिळाला असून यासाठी नागरिकांनी सजग राहिले पाहिजे त्याने पावती घेतली आज समाजामध्ये ग्राहक पंचायती सारखी संघटना काम करते आहे त्यांच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत असे अध्यक्ष भाषणात तहसीलदार सचिन लंगोटे यांनी सांगितले.
आलेल्या सर्वांचा सत्कार गुलाब पुष्प देऊन तहसीलदार लंगोटे यांनी केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आझाद अल्लापुरकर यांनी केले या कार्यक्रमास ग्राहक पंचायत सदस्य सतीश निपाणकर, सागर कारंडे, विज विभागाचे अधिकारी कुंभार तसेच देठे सचिन यांचे सह तहसील कार्यालयातील विविध खात्याचे कर्मचारी नागरिक उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार तहसीलदार लंगोटे यांनी मानले.