मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज - उदय वाघवणकर
कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या अखिलेश शुक्ला या उत्तर भारतीयावर पोलीस प्रशासन काय कारवाई करते ? हे पाहणे महत्वाचे आहे.आपल्याच राज्यात येऊन या उत्तर भारतीयांनी आपल्या टोळ्या निर्माण केल्या आहेत.आणि त्याकडे पोलीस प्रशासन व सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.येथील स्थानिक भूमिपुत्रांना सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत.परंतु उत्तर भारतीय असलेल्या अखिलेश शुक्ला सारख्यांना मंत्रालयात नोकरी मिळते.कारण आपलीच माणसे यांना सामील झाली आहेत.त्यामुळेच अशाप्रकारचे कारनामे करायला त्यांना बळ मिळते.