पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
राज्य शासनाने विविध योजना सुरू करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. या योजनांबरोबर राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या आणि जनतेच्या समस्या शासनापर्यंत मांडणाऱ्या प्रसार माध्यमातील फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांना स्वतंत्र घरकुल योजना, आणि विम्याची स्वतंत्र सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे अध्यक्ष विश्वास मोहिते, उपाध्यक्ष दीपक मोहिते, ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप कांबळे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष असलम शेख यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेल द्वारे केले आहे.
निवेदनातील माहिती अशी, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना, दीनदुबळ्यांसाठी वेगवेगळ्या योजना तसेच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांच्या नावाने योजना सुरू केले आहे त्यामुळे सरकार जनतेच्या काळजातील ताईत बनली आहे. या योजनेचे राज्यातून कौतुक होत असतानाच राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या आणि जनतेचे प्रश्न सरकार पर्यंत पोहोचवण्याचे महान काम करणाऱ्या म्हणजेच शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांसाठी सुविधा योजना सुरू करण्याची गरज आहे. यामध्ये पत्रकारांना आपल्या तुटपूजा मानधनावरती घर बांधणे अवघड आहे. तुटपुंजा मिळणाऱ्या मानधनावरती उदरनिर्वाह यामध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा कसाबसा करीत असल्याची महाराष्ट्रातील बहुतांश उदाहरणे आहेत. त्यामुळे पत्रकारांना शंभर टक्के सवलतीवर घरकुल उपलब्ध करून द्यावे, तसेच फिल्डवर काम करणारे पत्रकार हे वाहनातून जोखीमच काम करून प्रवास करीत तसेच काही ठिकाणी संवेदनशील प्रसंग उदभवतात त्या ठिकाणीही आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे काम करीत असतात. अशावेळी एखादी दुर्घटना घडू शकते आणि त्या पत्रकाराचे कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करून राज्य शासनाने सर्व पत्रकारांचे विमा हे राज्य शासनाने विमा कंपनीकडे नोंद करावी आणि त्या विम्याची रक्कम शासनाने भरावी. त्यामुळे पत्रकारांच्या संभाव्य दुर्घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाची वेळ येणार नाही. यापैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिल्डवर काम करणाऱ्या वारसांना जाचक अटी रद्द करून केवळ जिल्हा माहिती अधिकारी आणि स्थानिक वर्तमानपत्राकडे काम करत असल्याच्या पुराव्यावरती आधी स्वीकृती देण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
निवेदन देताना भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, उपाध्यक्ष दीपक मोहिते अहमदनगर, असलम शेख रत्नागिरी, दिलीप महाजन सांगली, दिलीप कांबळे वाई, पोपट भिसे खंडाळा, आदींनी हे निवेदन दिले आहे.