अनेक शिक्षण सम्राटांची घरे उध्वस्त करणारी मालिका आम्ही क्रमशः सादर करणार आहोत...
भाग एक
प्रवेश घोटाळा..
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यात माध्यमिक शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा या खासगी संस्थाद्वारे चालवल्या जातात.पण त्यांना राज्य सरकारचे सर्व नियम पाळावे लागतात.त्यासाठी जिल्हास्तरावर माध्यमिक शिक्षण,प्रशिक्षण ,विस्तार,वेतन,भविष्य-निर्वाह अधिकारी,समाजकल्याण अधिकारी अशी पूरक पदे कार्यरत आहेत.निमसरकारी या सदराखाली या माध्यमिक शाळांचा कारभार चालतो.
सोलापूर जिल्ह्यातील विशेषता ग्रामीण भागातून इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षणाची मान्यता असणाऱ्या तब्बल 600 हून अधिक अनुदानित शाळा तर मान्यता प्राप्त अकरावी बारावीचे वर्ग ही या शाळा मधून चालवले जातात.या सर्व माध्यमिक शाळा गेली तीस चाळीस वर्षे एका दाढीवाल्या शिक्षक नेत्याच्या कृपेने चालवल्या जातात जे सेवानिवृत्तीनंतरही आजही मुख्याध्यापक संघावर "मार्गदर्शक"या नावाने ठाण मांडून बसले आहेत.सो जि मा शा मु सं या गोंडस नावाखाली संघटित मुख्याध्यापक यांची टोळी जिल्हा शिक्षण क्षेत्रात वाईट प्रथांची निर्मिती करत आली आहे.जिल्ह्यातील शेकडो शाळा कार्यभार पंढरपूर येथील राजकीय शिक्षण सम्राट याच्या आदेशाने चालत आहेत.जिल्हा परिषद सदस्य पद देखील या नेत्याने भूषवले आहे. तथापि "पुरोगामी" विचाराच्या या नेत्याच्या बरोबर जिल्ह्यातील विविध मुख्याध्यापक हे मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आहेत. जिल्ह्यातील माध्यमिक,उच्च शाळा मधला सर्व काळा भ्रष्ट कारभार या मालिकेतून नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे शिक्षण विभागासमोर ठेवला जाणार आहे.
त्यातील भाग एक
प्रवेश घोटाळा..
सोलापूर जिल्ह्यातील अनेक दहावी बारावी परीक्षा केंद्रे यांना मान्यता आणून ग्रामीण भागातून ही केंद्रे वर्ग चालवले जात आहेत.यामध्ये शहरी भागात नापास झालेल्या आणि फ्रेश नवीन प्रवेश घेतलेल्या अनेक मुंबई,पुणे एवढेच नव्हे तर कर्नाटक,गोवा,गुजरात मधून काही मुलांना प्रवेश दिला जात आहे. उदाहरण दाखल यामध्ये अजनाळे तालुका सांगोला येथील इयत्ता बारावी वर्गात मूळचे चाळीस विदयार्थी शिक्षण घेत आहेत पण आज 260 हुन अधिक प्रवेश निश्चित झाले आहेत.मागील वर्षी व याही वर्षी सैन्य भरती प्रशिक्षण केंद्रातून,कर्नाटक मधून आलेल्या मुलांना थेट बारावी परीक्षेला प्रवेश देण्यात आला आहे.यापूर्वी ही प्रवेश देऊन पास केलेल्या मुलांना लाखो रुपये घेऊन बनावट उत्तीर्ण प्रमाणपत्र परीक्षा बोर्डातील "जावीर" नामक व्यक्तीच्या सहाय्याने दिले गेले असल्याची चर्चा आहे.असेच प्रवेश अक्कलकोट,मंगळवेढा,मोहोळ,सांगोला,माढा, माळशिरस तालुक्यासह पंढरपूर तालुक्यातील पळशी,सुपली,शेवते,केसकरवाडी,भटुंबरे,गादेगाव,बार्डी,पेहे,करकंब इसबावी,उपरीसह अनेक केंद्र शाळांतून देण्यात आले आहेत.केंद्रच शाळेत असल्याने दहावीला थेट प्रवेश दिला जात असून हजारो रुपये फी लाटली जात आहे.पास होण्याच्या हमखास खात्रीने प्रामाणिक अभ्यास करून ध्येय गाठणाऱ्या मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.सर्व केंद्राची तपासणी केल्यास इयत्ता पाचवी ते नववी आणि अकरावी आकडेवारी
त्यानंतर थेट दहावी आणि बारावी प्रवेश आकडेवारी यात तफावत थेट दिसून येत आहे तथापि याबाबत शिक्षण अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.जर ही तपासणी केली गेली तर वेगळीच आकडेवारी
समोर येऊन बोर्ड परीक्षा पूर्वी एक मोठं रॅकेट उघडकीस येणार आहे.की जे गेली अनेक वर्षे "जावीर" नामक व्यक्ती हाताळत आहे.त्यांची एकूण संपत्तीची तपासणी केल्यास राज्यात खळबळ उडणार आहे.
अनेक शाळांतून शासन मान्य अनुदानित वसतिगृह चालवले जात असून त्यात विदयार्थी रहात नसून केवळ कागदोपत्री उपस्थिती लावली जात असल्याचे खात्री लायक वृत्त आहे.याच वसतिगृह मध्ये बाहेरून आलेल्या दहावी मुलांचे बोगस प्रवेश देखील दाखवले जात आहेत असेच वसतिगृह सुपली,शेवते,मार्डी,ईश्वर वाठार,इसबावी,भटुंबरे येथे चालवले जात असुन त्याचीही चौकशी समाज कल्याण विभागाने करावी अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
दहावी बारावी थेट परीक्षा पद्धती मुळे एकेकाळी शहरातील नामांकित महाविद्यालये ओस पडत असून विद्यार्थी संख्या अपुरी अभावी अनेक शिक्षक वर्ग होत आहेत.अकरावी बारावी विज्ञान शाखा ग्रामीण भागात चालवून एकही प्रयोग न दाखवता थेट परीक्षा पास करून देण्यासाठी लाखो रुपये मागणी केली जात आहे.अशा अनेक नवं शिक्षण सम्राटांची संख्या वाढली आहे.
या परीक्षा पद्धतीला लगाम घालून शिक्षण अधिकारी लक्ष घालून कारवाई करतील का हे पाहणे गरजेचे आहे.भ्रष्टाचार मुक्त शिक्षण पद्धतीला नवीन सरकार पायबंद करणार का याकडे सामान्य पालक, शेतकरी,समाज यांचे लक्ष लागले आहे.
क्रमशः