जालना प्रतिनिधी तेज न्यूज
जालना समाजकार्य महाविद्यालय रामनगर, जालना येथे जनाई ते संत जनाबाई या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. डॉ. रेणुका भावसार व डॉ. नरसिंग पवार यांच्या प्रयत्नातून या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. संत जनाबाई विषयी अतिशय त्रोटक माहिती उपलब्ध असल्यामुळे याविषयी संदर्भग्रंथ तयार करण्याची कल्पना सुचली.
संत जनाबाई या एक उपेक्षित स्त्री म्हणून जीवन जगल्या. तत्कालीन समजव्यवस्थेमध्ये त्यांना स्वतंत्र स्थान मिळाले नाही, पुरुषप्रधान समजव्यवस्थेमध्ये जनाई सुद्धा भरडली गेली. परंतु तरीही स्वसामर्थ्यावर जनाई संत पदापर्यन्त जाऊन पोहचली, व संत जनाबाई म्हणून जगासमोर प्रसिद्ध झाली.
आई, बापाविना जनी दामाघरी मनापासूनच दासी म्हणून राहिली. आपले अवघे आयुष्य दमाशेट्टीच्या कुटुंबाच्या सेवेत अर्पण करणारी जनाई, अतिशय कष्टाळू होती. तिने विठ्ठल भक्तिमध्ये लीन होऊन स्वतःला विठ्ठलास समर्पित करून टाकले होते. विठ्ठलासच आपले माता पिता मानून सर्व दुःख सांगत होती.
प्रत्येक काम करताना जनाई विठ्ठलाला स्मरत, विठ्ठल भक्तीमध्ये लीन होऊन सर्व कामे करत असे. विठ्ठलाचें स्मरण करतच संत जनाबाईने असंख्य ओव्या, अभंग, कथा, भक्तीसार यांचे दालन समाजासा उपलब्ध करून दिले. आपल्यावर कितीही मोठे संकट असले , प्रतिकूल परिस्थिती असली तरीही आपण आपल्याला हव्या त्या ध्येयापर्यंत पोहचू शकतो, हे जनाईने तिच्या कर्तृत्वामधून सिद्ध केले. संत जनाईला विविध पुस्तके, ग्रंथरूपात टिपने, अभ्यासणे अतिशय आनंददायी वाटत होते. तिच्या कार्याचा करावा तेवढा गौरव कमीच वाटतं होता.
संत जनाबाईवर माहितीपर संदर्भ ग्रंथ तयार करण्यासाठी विविध ठिकाणाहून आलेल्या संशोधनपर लेखाचे संकलन करण्यात आलेले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी यासाठी लेख पाठवून सहकार्य केले. आणि ग्रंथ सुंदर तयार झाला.. जालना समाजकार्य महाविद्यालय रामनगर जालना येथे संत जनाबाईच्या संदर्भ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, प्रशासकीय अधिकारी श्री रमेश गजर, श्री विकास लाखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील प्रा. डॉ. रेणुका बडवणे, डॉ नरसिंग पवार, डॉ. सुधीर गायकवाड, डॉ, मधू खोब्रागडे, डॉ. दीपक बुक्तरे, डॉ. मीना बोर्डे, डॉ. बालाजी मुंडे, श्री बिभीषण शेजूळ, शिवाजी भुतेकर, संजय गाडे, योगेश पवार, अनिल हजारे, किशोर ढेकळे, अंजीराम जाधव इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. रेणुका भावसार व डॉ. नरसिंग पवार यांनी संत जनाबाई यांच्या संदर्भ ग्रंथाविषयीं आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्यांनी संत जनाबाईविषयी आपले विचार प्रकट केले. अंजीराम जाधव यांनी आभार मानले.