मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
शेतकऱ्यांच्या माल थेट ग्राहकाला मिळावा या उद्देशाने मुंबई आणि आसपासच्या शहरात आठवडी बाजार हा उपक्रम सुरू करण्यात आला असून डोंबिवली येथे आठवड्यातून तीन दिवस गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी तो भरविण्यात येत आहे.
गावाकडे ठरलेल्या दिवशी अमुक एका ठिकाणी वर्षांनुवर्ष आठवडी बाजार भरत असतो.पण मुंबई ठाणे पनवेल डहाणू आणि अनेक मुख्य मोठ्या शहरांच्या ठिकाणी तो भरविण्यास सुरुवात होणार आहे.यामुळे ग्राहकांना ताज्या भाज्या, कडधान्य, कांदा बटाटा, मसाल्याचे पदार्थ, फळे सेंद्रिय आणि विषमुक्त मिळन्यास मदत होईल. बऱ्याचदा शहरातील बाजारात जो भाजीपाला आणि खाण्याच्या वस्तू मिळतात त्या रासायनिक खत वापरून तयार केलेल्या आणि त्यावर औषध फवारणी केलेली असते.
यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.काहीवेळा रेल्वे रुळालगत नाल्यातील सांडपाण्यावर देखील भाजीपाला पिकवला जातो.यामुळे रोगराई पसरण्याचा धोका असतो.नागरिक आजारी पडू शकतात.आठवडी बाजार शहरात जर नियमित सुरू झाले तर नागरिकांना देखील ताजातवाना भाजीपाला,वस्तू मिळतील आणि बळीराजाला देखील चार पैसे जास्त मिळू शकतात.डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी हा उपक्रम डोंबिवली येथे जरी सुरु केला असला तरी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनी आपापल्या विभागात नक्कीच आठवड्यातून एक फोन दिवस असा बाजार सुरू करण्यास काहीच हरकत नाही.