नाराजीनाट्य
फडणवीस सरकार स्थापन झाले पण छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, रवि राणा, विजय शिवतारे, दीपक केसरकर, राजेंद्र गावित, तानाजी सावंत या वरिष्ठांना मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीत असंतोष खदखदत आहे.छगन भुजबळ यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली तर शनिवारपर्यंत यादीत नाव होते आणि फडणवीस बावनकुळे यांनी मला आश्वस्त पण केले होते पण रविवारी अचानक माझे नाव नसल्याने मला धक्काच बसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.असे असले तरी या वरिष्ठांनी अनेक वर्ष विविध खात्याचे मंत्री म्हणून या आधी काम केले तरी मंत्री पदाची यांची हौस (खाज) अजून गेलेली नाही.वरिष्ठांनी जर स्वःहून बाजूला झाल नाही तर अनेक वर्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या पण मंत्रिपद हुकलेल्यांना कधी संधी मिळणार.वर्षानुवर्ष त्याच त्याच घरात किती दिवस पद आणि तिकीट वाटली जाणार ? आजही प्रत्येक राजकीय नेत्यांचे किमान दोन जण लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महा मंडळांवर आहेतच.आपल्याला निवडून आणणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार हे लोक करणार आहेत की नाही ? की आयुष्यभर कार्यकर्त्यांनी यांची धुणीभांडी च करायची ? मंत्री झाल्यावर पुढील पन्नास वर्ष अनेक पिढ्या बसून खातील एवढे हे लोक गब्बर होतात.आपण गेलो तरी कुटुंबातील कोणाला पद मिळावे म्हणून लॉबिंग करतात.वय झाले तरी खुर्ची सोडायची दानत यांच्यमध्ये नसते.पूर्वीचे नेते आणि आताचे स्वार्थी नेते यंच्यमध्ये जमीन असमानाचा फरक जाणवतो.बाळासाहेबांची सत्ता आली तेव्हा त्यांना आरामात मुख्यमंत्री होता आले असते पण त्यांनी मी कधीच निवडणूक लढविणार नाही आणि मंत्री होण्याची माझी कोणतीच लालसा नसल्याचे आणि खुर्चीला लाथ मारतो असे म्हटले होते.पण आताचे लोक खुर्चीला जळू सारखे चिटकून बसलेले दिसतात.
गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व