"खेळखंडोबा माशिचा"
भाग 3
उपस्थिती
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील मुलांचे हजेरीपत्रक हे आजही अनेक माध्यमिक शाळा मधून दरमहा लिखित स्वरूपाचे मुद्दाम करवून घेतले जात आहे.की ज्यामुळे शिक्षण हा मूळ हेतू सोडून केवळ कारकून काम शिक्षक यांचे कडून करवून घेतले जात आहे.एकदा मुलाचा प्रवेश क्रमांक मिळाला की पुन्हा दरमहा त्याचे आई-वडील, जात,धर्म,लिंग,जन्मतारीख, फी प्रकार बदलणारा नसला तरीही पुन्हा तीच ती माहिती सक्तीने भरून घेण्यात मुख्याध्यापक संस्था चालक धन्यता मानतात.
अनेक शाळा मधून मुले हजर नसतानाही त्यांच्या हजेरी मोघम स्वरूपात लावल्या जात असून त्यावर आधारित पट शिक्षक कायम ठेवताना घरातील लोक ठेवून इतरांना अतिरिक्त केले जात आहे.ऑनलाईन हजेरी एखाद्या शिक्षकाला सर्व वर्गाची भरायला लावली जात आहे.तर ऑनलाईन च्या जमान्यात संगणक शाळेत असताना छापील उपस्थिती पत्रके तयार होत असून त्यात हवे ते बदल करता येत असताना जाणीवपूर्वक शिक्षक यांना सदर कॅटलॉग मासिक मिटिंग वेळी सक्ती केली जाते.एकदा अभ्यासक्रम ठरवला असताना पुन्हा तोच लेखन करून मागील रकाने भरणे सक्ती फक्त माध्यमिक शाळांतून करण्यात संस्था चालक मुख्याध्यापक आग्रही असतात.
शिक्षक हजेरी पत्रके ही संस्था चालक यांच्या घरी वेगळी व ऑफिस मध्ये वेगळी ठेवली जात असून काही शिक्षक यांना रजा मागणी वरून मुद्दाम भेदभाव केला जात असून शिक्षक यांचे जीवन मान तणावग्रस्त होत आहे.अनेक कर्मचारी महिना- महिना हजर नसले तरीही त्यांच्या सह्या एकत्र घेतल्या जातात. पण एखादा शिक्षक प्रवासातून दहा वीस मिनिट उशिरा आल्यास त्याची अर्धी रजा मोजली जात आहे.अनेक शाळा मधून डमी शिक्षक कार्यरत असून मूळ शिक्षक कर्मचारी घरी बसून पगार घेत असल्याचे दृश्य आहे.मुख्याध्यापक हे स्वतः कधीही येतात व कधीही गेले तरी त्यांना विचारण्याचे धाडस कोणीच करत नाहीत.काही मुख्याध्यापक तर शाळा कालावधीत दारूच्या बार मधून आढळून आल्याचे दृश्य आहे.अनेक वेळा मुख्याध्यापक हे न काम करताच वर्षानुवर्षे केवळ पगार काढत असून असे शेकडो संस्थाचालक मुख्याध्यापकांना पाठीशी घालण्याचे पाप सदर दाढीवाले नेत्यांनी केले आहे.अनेक बँकांची कर्जे काढताना मुख्याध्यापक शिक्षक यांच्या नावे कर्जे उचलून ते भरत नाहीत अशा तक्रारी आहेत.अनेक शाळांमधून जामीनदार शिक्षक यांचे पगार थकीत आहेत.तर अनेक शिक्षक तक्रार कुठे करावी या भीतीपोटी चिंतेत आहेत.सीबील खराब झाल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही कर्ज न मिळण्याची नामुष्की शिक्षकांवर आली आहे. याबाबत आता नूतन सरकार लक्ष घालणार का 40 वर्षे माध्यमिक विभाग मधून चालत राहणाऱ्या कु प्रथा अशाच पुढे चालत राहणार याबाबत शिक्षण अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लक्ष घालून गांभीर्य दाखवून कारवाई करावी अशी अपेक्षा पालकामधून होतांना दिसते आहे.
धक्कादायक
मुलांना मुलींना उपस्थिती भत्ता मिळत असतो तर विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळत असतात पण मुलाच्या खाते न येता असे अनुदान थेट मुख्याध्यापक खाते येत असल्याने आजपर्यंत लाखो रुपये लिपीक आणि मुख्याध्यापक यांनी बनावट सह्या करून हडप केल्याचे वृत्त आहे.एकही पालक यांना कोरोंना काळातील परत मिळालेली फी देखील दिली गेली नाहीय.मुलांच्या या रकमा हडप करणारी टोळी कार्यरत असून विविध शिक्षण अनुदाने ही परस्पर काढून घेतली जात असतात.प्रत्यक्ष मात्र मुलांच्या माथी उपेक्षा येत आहे.एखादा पालक आलाच तर त्याला मॅनेज केलं जातं अथवा त्याच्या मुलाला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे हे सर्व प्रकार विशेषतः ग्रामीण माध्यमिक शाळांमधून घडत आहेत.एकदाही शिक्षण अधिकारी तपासणी साठी येत नाहीत आणि आलेच तर त्यांना गाडीतच भरवून सांगितले जाते आणि शिक्षक यांना वेडे-वाकडे बोलून दमबाजी केली जात आहे.
प्रवास करून वाहने खरेदी करीता सक्तीने पगार कपात केली जात असून पिवळ्या गाड्या इतर कामासाठी ही वापरल्या जात आहेत.त्या ड्रायव्हर पगार इतर खर्च सक्तीने शिक्षक यांचे कडून दरमहा खंडणी स्वरूपात गोळा केला जात आहे.दरमहा पगाराच्या तीन टक्के कपात सक्तीने घेतली जात आहे.न दिल्यास त्याला सारखे मानसिक त्रास देऊन तणाव निर्माण केला जात आहे.निकोप शिक्षण मिळावे ही माफक अपेक्षा असणाऱ्या या राज्यातील स्थिती कधी बदलणार याकडे अनेक शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
क्रमशः