"खेळखंडोबा माशिचा"
भाग 2
शाळेचा वेळापत्रक घोटाळा
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन पुणे यांच्या वतीने इयत्ता निहाय पाठयपुस्तक, विषय निर्मिती केली जाते तर विभाग निहाय,विषय वेळापत्रक नुसार त्याची अंमलबजावणी केली जाते.यामध्ये नेमून दिलेला अभ्यासक्रम त्यावर आधारित चार परीक्षा सुट्या कार्यभार शिक्षक संख्या ठरवली जाते. वयोगट नुसार विषय यादी निश्चित केली जाते.विषयवार शिक्षक नियुक्ती व शिक्षण पद्धती ठरवली जाते.
राज्यातील अनेक माध्यमिक शाळा मधून शासन मान्य वेळेपेक्षा दोन तास अतिरिक्त भरवले जात असून बालमानस शास्त्रानुसार मुलांचे बालपण हिरावले जात आहे.सरासरी 5 तास कार्यभार अपेक्षित असताना
ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा या केवळ दुराग्रही शिक्षण संस्था चालक यांच्या आदेशानुसार सकाळी 9:30 ला भरवले जात आहेत.तर 5 :20 ला सोडले जात आहेत.गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षकांना वेठीला धरून परिपाठ बंद आदेश असताना एक तास मैदानात भर उन्हात प्रतिज्ञा,संविधान,राज्यगीत,राष्ट्रगीत बोधकथा,दिनविशेष ,सक्तीने सादर करून घेतले जात आहेत.सक्तीने पाचवीच्या मुलांचे जादा तास,उन्हाळी तास ठेवले जात आहेत. टाचण लेखन कोर्टाने रद्द करून ही सक्तीने लिहून घेतले जाणाऱ्या शाळेत मुलांना वाचण्यासाठी वृत्तपत्रेही नाहीत ना माहिती पट पाहण्यासाठी प्रोजेक्टर.
याच वेळापत्रक नुसार शारीरिक शिक्षण,कार्यानुभव, कलाशिक्षण, संगीत शिक्षण संगणक आदी विषय मुलांच्या सर्वांगीण विकासाला गरजेचे असताना केवळ कागदावर वेळापत्रक लिहून ठेवले जात आहेत. पण प्रत्यक्षात मात्र मुलांना खेळायलाच सोडले जात नसल्याची तक्रार मुले करीत आहेत.तर काही शाळांना पुरेसे खेळाचं साहित्य नाही.केवळ खो खो कबड्डी हे दोन खेळ मुलांचे प्रतिनिधी बनवून खेळतात व त्याचे श्रेय शाळा लाटत आहेत.ग्रामीण भागात तर चक्क खेळाचा तास न सोडता उलट त्या तासाला भर उन्हात मुलांना अभ्यासिकेला सक्तीने बसवले जात आहे.एकीकडे ऑलम्पिक खेळाच्या बातम्या झळकताना अजून दोन अंकी पदकांचा आकडा भारताला न गाठता येण्याचे खरे कारण हे मैदानी खेळाचे शिक्षण बंद पडत चालणे होय.स्काऊट गाईड या गोंडस नावाखाली फक्त कागदी विषय रंगवले जात असून ते सर्व खेळाचे कलेचे तास इतर विषय शिक्षक यांना वापरायला दिले जात आहेत.
गरज नसताना शाळेच्या कामकाज वेळ वाढवून प्रत्यक्ष मुख्याध्यापक हे स्वतःला न शिकवणारे तास नावे टाकून कार्यभार बोगस डमी शिक्षक याला सोपवून इतरत्र फिरत राहतात.कधीतरी शाळेत येऊन मिटिंग घेऊन केवळ धमक्या देऊन काम करणाऱ्या शिक्षक कर्मचारी यांना वेठीस धरले जात आहे.कोणत्याही शाळेत जाऊन चौकशी पाहणी केल्यास अनेक संस्था चालक यांचे घरातील मुले, सुना,नातवंडे नियुक्त असून त्यांचेसाठी घरी हजेरीपत्रक नेऊन महिन्याच्या सह्या एकत्र घेतल्या जात आहेत.त्याजागी इतर व्यक्ती कार्यरत आहेत की ज्यांना केवळ तुटपुंजे मानधन देऊन राबवून घेतले जात आहे.प्रयोग शाळा परिचर,सहाय्यक,नाईक,शिपाई वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक आदी पदे ही घरातील व्यक्तींच्या नावे पगार काढले जात आहेत तर त्याजागी अन्य व्यक्ती नियुक्त न करता तो संपूर्ण भार एक दोन शिपाई वर पडत आहे.स्वच्छ संडास नसणे,पिण्याचे पाणी नसणे,वर्ग मुलांना झाडायला लावणे,मैदाने स्वच्छ करून घेऊन हात धुवायलाही पाणी नसणे आदी घटना घडताना दिसून येत आहेत.भात शिजवणे, स्वयंपाकी भाजी खरेदी नावे अनेक बनावट पावत्या व एकाच व्यक्तीच्या नावे चेक काढून मोठा आर्थिक घोटाळा केला जात आहे.संगणक शिक्षण नावाखाली कोणतीही तरतूद नसताना शेकडो संगणक धूळ खात पडलेले असून मुलांना त्याला हात ही लावू दिला जात नाहीय तर कसे होणार आय टी तज्ञ मुले असा प्रश्न ग्रामीण पालकांमधून विचारला जात आहे.अनेक शाळांमधून कार्यानुभव विषय फक्त कागदोपत्री राबवला जात असून साधी व्याख्या कृतीही मुले करीत नाहीत.कला विषयासाठी प्रत्येक शाळेत एक शिक्षक गरजेचा असताना त्याला मुद्दाम इतर वर्गाचे विषय अध्यापन सक्ती केली जात असून वर्गशिक्षक ही बनवले जात आहे की जे नियमबाह्य आहे.नाट्य,अभिनय,नृत्य,मातीकाम,कागदकाम,गायन,वादन हा अभ्यासक्रम कलेचा पाचवी ते आठवीच्या मुलांना सक्तीचा असताना मुख्याध्यापक संघ या विषयाकडे दुर्लक्ष करून परीक्षा वेळापत्रक बनवून मुलांना अरसिक बनवत आहे.
शाळेत एक आणि शिक्षण खात्याकडे वेगळे असे अनेक घोटाळे उघडकीस येणार असून व्यक्तीचे नाव व त्या जागी कार्यरत व्यक्ती यात मोठी तफावत दिसून येणार आहे.याची विषय वेळापत्रक नियुक्ती निहाय चौकशी शिक्षण विभाग करेल का?याकडे सुजाण पालक यांचे लक्ष लागले आहे.वेळेच्या सक्तीने दूर वाड्या वस्तीवरून मुलांना लवकर उपाशी पोटी शाळेला जावं लागतं असून कधी कधी शाळेत भात बनवला जात नाही त्यामुळे उपाशी रहावे लागत आहे. उशिरा शाळा सुटत असल्याने त्यांना ना धड शेतीची ना शिक्षण याची गोडी लागत नाहीय.या सर्व प्रकाराची चौकशी विशेष पथक नेमून करावी अशी अपेक्षा पालक वर्गातून होत आहे.