कविता सगळे सुखाचे सोबती
सगळे सुखाचे सोबती दुःखात कोणी नसते,
जेव्हा मी दुःखात होते
तेव्हा कोणी नव्हते,
एकटीच मी लढत होते,
खिंड होती लढवायची
बाजी कुणी मारायची
बाजी मी मारत होते
कधी हार कधी जीत
एकटीच मी लढत होते
खिंड मी लढवत होते,
कधी मुका मार, कधी
रक्त बंबाळ मी होत होते,
आयुष्याची परीक्षा देत होते
एकटीच मी लढत होते
अखेर तर झालीच नाही
लढाई लढतेच आहे
भावनाच्या बाजारात एकटीच मी झुंजते आहे
ना कधी रडले, ना कधी पडले, अजुनी ताठ मानेन
जगते आहे जगते आहे.
कवी सीमा अवसेकर