यावेळेस पडद्याआड घडामोडी खूप घडल्या माळशिरस मध्ये सातपुतेला उमेदवारी देण्यास खुद्द फडणवीस देखील इच्छुक नव्हते.. सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात यांचे नाव चर्चेत होते.. मात्र लोकसभा निवडणुकीची उतराई म्हणून मोठा तह झाला या इकडे नको दुसरा माणूस द्यायचा करार झाला.
माळशिरस मतदारसंघात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नाव स्थानिक भाजपकडून फायनल झाले होते.मात्र सोलापूर शहर मध्य मधून पत्ता कट झाल्यानंतर माळशिरस मधून मलाच उमेदवारी द्यावी म्हणून मुंबई ते दिल्लीतील नेटवर्क त्या फायनल झालेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची उमेदवारी उडवली.. त्या कार्यकर्त्याला सागर बंगल्यावर खुद्द फडणवीस यांनी माझ तुझ्यावर कायम लक्षात आहे म्हणून थांबण्यास सांगितले.
उत्तम जानकर हे मोहिते-पाटीलांना विरोध करत असतना राम सातपुते विरोधात लाख मते घेऊन फक्त दोन हजाराने पडलै होते. .तेव्हा ते कायम म्हणत होते हे लाख मते माझे आहेत.. आता मोहिते-पाटील गटा कडून लढताना जानकर १३००० मतांनी निवडून आले व सातपुतेना लाख मते पडली.. वास्तविक पाहता सातपुते यांना पडलेली मते पारंपरिक मोहिते-पाटील विरोधकांची आहेत..विशेष म्हणजे सातपुतेने रणजितसिंह मोहिते-पाटलांचा फोटो लावून प्रचार केला आहे.
आ.उत्तम जानकर जसे म्हणत होते लाख मते माझी आहेत त्याच प्रमाणे सातपुतेना देखील या भ्रमात राहू नये.
राम सातपुतेची माळशिरस तालुक्यातून साधा जिल्हा परिषद सदस्य होण्याची लायकी नाही. त्यांना माझे खुले आवाहन आहे. जिल्हा परीषदेला उभा राहून निवडून येऊन दाखवा.. नाही मोहिते-पाटलांच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पाडला तर बोला.
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपला खासदार दिला होता,सातपुतेला आमदार केला होता.जि.प.त भाजपची सत्ता आणली होती.
राम सातपुतेची कोणतीही लायकी नाही. त्यांना आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केला होता.स्वतःच्या कर्माने पडलेत..