सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर शहर मध्य मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांना इंडियन मेडिकल असोसिएशन ,सोलापूर यांच्यातर्फे काल आरोग्याच्या जाहीरनामा देण्यात आला. यामध्ये डॉक्टर्स ,हॉस्पिटल्स व वैद्यकीय सेवेत असणाऱ्या व्यक्तींवरील हल्ले ,हॉस्पिटल रजिस्ट्रेशन मधील जाचक अटी ,फायर एनओसी प्रदूषण नियंत्रण, बायोमेडिकल वेस्ट मधील शासनाच्या जाचक अटी व त्यामुळे सर्व डॉक्टर्स, हॉस्पिटल्स व पॅरामेडिक्स यांना होणारा त्रास दूर करावा असे लेखी आवाहन देण्यात आले आहे.
डॉ. संदीप आडके हे उच्चशिक्षित सुपर स्पेशालिस्ट अस्थिरोग तज्ञ आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या वरील बऱ्याच समस्यांबाबत मागील पाच वर्षांमध्ये आवाज उठवून डॉक्टरांना व हॉस्पिटलसना होणाऱ्या त्रासाबद्दल वाचा फोडलेली आहे. हॉस्पिटल्सचे नूतनीकरण अथवा नोंदणी करताना संबंधित अनेक विभाग गरज नसताना अनेक सर्टिफिकेटची मागणी करून नाहक त्रास देत आहेत व त्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. या त्रासातून प्रत्येक डॉक्टर, हॉस्पिटल्सला जावे लागत आहे.डॉक्टरांवर होणारे हल्ले व त्यांच्या समस्याबाबत कोणत्याही पक्षाने अथवा लोकप्रतिनिधींनी काम केलेले नाही. सोलापूर शहरातील बायोमेडिकल वेस्टचा मोठा भ्रष्टाचार डॉ संदीप आडके यांनी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत डॉक्टरांच्या संघटनांना बरोबर घेऊन मांडलेला आहे. सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून सोलापूर मध्ये होटगी रोड विमानतळाचे नूतनीकरण व विमान सेवा सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार असल्यामुळे सोलापूर मधील वैद्यकीय क्षेत्रातील आयएमएच्या जाहीरनाम्यातील समस्या दूर कर करण्याबाबतत काल सोलापुरातील सर्व पॅथीचे डॉक्टर्स ,लॅब टेक्निशियन ,फार्मा व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचा परिसंवाद आयोजित केलेला होता. त्यामध्ये डॉ. संदीप आडके यांनी तात्काळ वरील सर्व समस्यांचे योग्य ते निरसन केले जाईल याची लेखी हमी आयएमएचे अध्यक्ष डॉ किरण सारडा व सचिव डॉ. निशिकांत मस्के यांच्याकडे दिली.
आयएमए महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांकडे अशा प्रकारचा जाहीरनामा देण्यात आलेला आहे परंतु सोलापूर मध्ये सर्वप्रथम डॉ. संदीप आडके यांना हा जाहीरनामा देण्यात आलेला आहे व महाराष्ट्रामध्ये या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन देणारे डॉ. संदीप आडके हे पहिले उमेदवार ठरलेले आहेत .
डॉ.संदीप आडके हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील सर्वात उच्चशिक्षित उमेदवार सुद्धा गणले जात आहेत .डॉ. आडके यांनी सोलापूरसाठी अनेक चांगली कामे आत्तापर्यंत करून दाखवलेली असल्यामुळे सोलापूर विचार मंच व सोलापूरच्या उच्चशिक्षित व सर्व स्तरातील जनतेच्या मागणीने त्यांनी सोलापूर मध्य मधून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. जर सोलापूरच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी सोलापूरच्या जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर त्यांनी आपल्या १३ कलमी जाहीरनाम्याप्रमाणे सोलापूरमध्ये अमुलाग्र बदल करून सोलापुरातून विमान सेवा सुरू करणे, आयटी टेक्स्टाईल, रेडीमेड गारमेंट व वैद्यकीय क्षेत्रात नवीन उद्योग आणणे, येथील धार्मिक पर्यटन व माळढोक संवर्धन व पर्यटन केंद्राचा विकास करणे ,शहराला दोन दिवसाड पाणीपुरवठा करणे,रखडलेल्या सर्व उड्डाणपूल व रेल्वे पूल, रिंग रोडचे काम करणे, सार्वजनिक परिवहन मध्ये ३०० नवीन बसेस आणणे, सोलापूरला कचरा,अतिक्रमण, मिरवणुक व डीजे, अवैध धंदे व गुन्हेगारी मुक्त करणे, कला ,क्रीडा व सांस्कृतिक वारसांचे जतन व संवर्धन करणे, सोलापुरातील प्रत्येक जाती-धर्माच्या नागरिकाला मूलभूत व पायाभूत सुविधा देऊन सोलापूरकरास अस्मितेने जगण्याचे सुराज्य देण्याचे जाहीर केलेले आहे. सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व सोलापूरकरांनी त्यांच्या 'हिरा' या चिन्हास निवडून द्यावे अशी त्यांची मनीषा आहे.