महायुती, महाविकास आघाडी, पंतप्रधान नरेंद्र मोदी ,देवेंद्र फडणवीस ,सुशील कुमार शिंदे ,प्रणिती शिंदे , नरसय्या आडम ,धर्मराज काडादी वगैरे विरुद्ध तक्रार दाखल.
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर मध्य मधील अपक्ष उमेदवार डॉ. संदीप आडके यांनी आचारसंहितेचा भंग केल्याबाबत मुख्य निवडणूक कमिशनर नवी दिल्ली ,मुंबई ,जिल्हाधिकारी व शहर मध्ये चे निवडणूक निर्णय अधिकारी पडदुने यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
आदर्श आचारसंहितेनुसार १८नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता निवडणुकीचा प्रचार संपणे गरजेचे असताना सुद्धा महायुती ,महाविकास आघाडी ,मनसे ,धर्मराज कडादी, नरसय्या आडम वगैरे यांनी सोलापुरातील बहुसंख्य वृत्तपत्र व वाहिन्यांवर आजपर्यंत निवडणुकीबाबत आपल्या जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत. १२ नोव्हेंबर नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान असंख्य अनधिकृत डिजिटल होर्डिंग शहरभर लावण्यात आलेले होते. त्याबाबतच्या परवान घ्या व खर्चाबाबत संधीगदता आहे. सोलापूर दक्षिण मधील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा उघड प्रचार सुशील कुमार शिंदे यांनी आपले मतदान केल्यानंतर सर्व वाहिन्यांसमोर मुलाखत देऊन पोलिंग बुथ जवळ आज केलेला आहे. धर्मराज काडादी हे शांत व चांगले उमेदवार असल्यामुळे मी त्यांना मतदान केले आहे असे बोलून आपण कोणाला मतदान केले आहे हे उघड करून इतर सर्व नागरिकांवर उघडपणे धर्मराज काडादी यांना मतदान करावे असा मेसेज मीडिया तर्फे दिला आहे. हीच गोष्ट खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील केली आहे. धर्मराज काडादी यांनी सुद्धा निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रतिबंधित वेळेत प्रेस कॉन्फरन्स घेवून व मीडियामध्ये बातम्या वजाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.
शहर मध्य मधील मकापाचे नरसय्या आडम यांनी सुद्धा आजपर्यंत अनधिकृत पणे जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत.
त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झालेला आहे व त्यांनी लोकांना प्रभावित केलेले आहे. अशा अनेक कलमांखाली डॉ. आडके यांनी तक्रार दाखल केलेली आहे. निवडणुकालावधीमध्ये सोलापूर व महाराष्ट्रातील अनेक मीडिया हाऊसने पेड न्यूज प्रसिद्ध करून ठराविक उमेदवार व पक्षांना प्रसिद्धी दिलेली आहे .त्यामुळे ही निवडणूक दूषित झाल्यामुळे निवडणूक रद्द करावी व सर्व संबंधित उमेदवार, पक्ष व त्यांना प्रचारामध्ये साथ देणाऱ्या लोकांवर निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.