मुंबई प्रतिनिधी तेज न्युज उदय वाघवणकर
जोगेश्वरी पूर्व मजास वाडी येथील सन्मित्र मंडळाच्या मंचावर ९ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर यांच्या समर्थकांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप होत आहे.
येथे भेटवस्तू देऊन मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचे स्थानिक विरोधी पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.मोठ्या संख्येने महिलांनायाठिकाणी बोलविण्यात आल्याने चेंगराचेंगरी होऊन अपघात होण्याची शक्यता होती.
या घटनेमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.त्यामुळे जोगेश्वरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.