प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य,
माझे एक मत देश हितासाठी उपयोगात आणणार .भाग - ३
भारतीय संसदीय प्रणालीमध्ये बहुमताला अत्यंत महत्त्व आहे. सन १९९६ मध्ये अवघ्या एक मतांनी केंद्र सरकार कोसळले. देशाच्या पंतप्रधानासहित संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला.
या देशाच्या हिताची अनेक विधेयके लोकसभा व राज्यसभेत केवळ एक अथवा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या मतांनी फेटाळली गेली.
याचाच अर्थ प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे असते. मला देखील एक मताचा संविधानाने दिलेला अधिकार मी वापरणार, माझे एक अनमोल मत मी देशहितासाठी उपयोगात आणणार.
*शंभर टक्के मतदान - देश हितासाठी मतदान*
या संकल्पसह मी जरूर मतदान करणार.
- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर