भारतातील उपेक्षित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष करावा लागतो आहे. हे दुर्दैव आहे.
पहाटेच्या सुमारास गावातून भक्ती गीत म्हणत सगळं गाव भक्तीमय करणारा वासुदेव काळाच्या पडद्याआड गेला आहे.. आता वासुदेव शहरात कधीच दिसत नाही...काळ बदलला आज वासुदेव समाज परिवर्तनाच्या वाटेवर आहे. मात्र गावातील गावपण जपणारा हा समाज आजही विकासासाठी धडपडत आहे.वा,सुदेव समाजातील तरुण उद्योगाच्या नवीन वाटा शोधायच्या मागे आहेत.
जून्या प्रथा पध्दती बदलतं गेलेल्या आहेत मात्र या समाजाला आजही न्याय देण्यासाठी कोणतेही सरकार पुढं येत नाही..
भारत महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे.
पण उपेक्षित असणाऱ्या गोंधळी, गारुडी, जोशी,कुडमुडे,देऊळवाले, गावगाडा चालवणारे समाजातील अनेक समाजातील निम्न जातीच्या लोकांना मरण यातना भोगाव्या लागतात.
अंधश्रद्धा, अज्ञान आणि शिक्षणाचा अभाव यामुळे या दुर्लक्षित समाजातील लोकांना सरकार व समाज सुधारक दुर्लक्षित करत आहेत.
ही मोठी शोकांतिका आहे..
देश स्वतंत्र झाला मात्र या देशातील संस्कृती जपण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे समाज आजही माणूस म्हणून जगण्याची लढाई लढताना दिसत आहेत.
गावोगावी फिरणारा डोंबारी समाज आजही भाकरी ची लढाई लढताना दिसत आहे.
तर समाज संवर्धनासाठी कार्य करणारे रामोशी बेरड, वडार समाजातील नेत्यांनी समाज संवर्धनासाठी प्रयत्न केलेले दिसत नाही हे दुर्दैव आहे..
समाज व्यवस्थेत बारा बलुतेदार आहेत. यांचा आर्थिक व सामाजिक स्तर सुधारण्यासाठी कोणत्याही पुढाकार घेत नाही.
समाजकारण आणि राजकारण करणारे पुढारी केवळ पैशाच्या व सत्तेच्या मागे धावताना दिसतात.समाजातील बहुसंख्य लोकांना अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण यासाठी आजही जगण्याची धडपड करावी लागते आहे..
केवळ एक दोन पुढारी आपल्या कुटुंबातील लोकांना रोजगार देऊन व पदे मिळाली म्हणून संतुष्ट होऊन चालणार नाही.
भारत महासत्ता बनवायचा असेल तर निम्न जातीच्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत..
आरोग्य व शिक्षण हे सर्वांना मिळत नसेल तर भारतातील लोकांना केवळ जगण्याचा संघर्ष करण्यात जीवन खर्च करावे लागणार आहे..
गरज आहे समाजातील दुर्लक्षित जाती ना शिक्षण व आरोग्य सुविधा देऊन त्यांचं जीवन सुधारण्याची, गरज आहे त्यांचा माणूस म्हणून जगण्यासाठी योग्य आधाराची सोयी सवलती देऊन मोजक्या लोकांचे जीवन सुधारु शकते. पण सकल परिवर्तन घडवून आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
लेखन विजय टाकणे पाटील.पत्रकार ९९२१४९४९९८.