पंढरपूर प्रतिनिधी प्रशांत वाघमारे तेज न्यूज
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असून, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरती भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे कारवाई केली जाणार असल्याची माहिती, निवडणूक प्रक्रिया व प्रचारा दरम्यान होणाऱ्या गैरकृत्या पासून परावृत्त होण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली आहे.
पोलीस विभागाकडून सोशल मीडियाचे मॉनेटरिंग केले जाणार आहे. कोणत्याही उमेदवाराच्या संबंधित त्यांचे वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्तरावर अवहेलना होईल असे आक्षेपार्य टीकाटिप्पणी करणे, मजकूर; फोटो; व्हिडिओ एडिटिंग मर्फिग करून प्रसारित करणे व आलेल्या संदेशावर आपले मत प्रकट करणे व पुढे पाठवणे. मतदारांचे मन वळवण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांना धार्मिक, भाषिक आक्षेपार्ह मजकूर पाठवणे,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा होईल असे स्वतंत्र ग्रुप तयार करून त्यावर आक्षेपार्ह फोटो,व्हिडिओ, मजकूर पाठवणे हे आदर्श आचारसहितेचा भंग ठरते. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद निर्माण होईल अशा पोस्ट टाकणारा व त्याबरोबर ग्रुप ॲडमिनलाही दोषी ठरवण्यात येईल. त्यासाठी व्हाट्सअप ग्रुप वरील सेटिंग बदलून ओन्ली फॉर ग्रुप एडमिन करून घेण्यात यावी. सोशलमीडिया वरती कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट टाकने,त्या पोस्टना लाईक करणे, फॉरवर्ड करणे व प्रतिसाद देणे हा कायद्याने गुन्हा असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ .अर्जुन भोसले यांनी मतदान केंद्रावरती जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली आहे. निवडणुकीसाठी असणाऱ्या मतदान केंद्रावरती जाण्यासाठी लागणारा प्रतिसाद वेळ व मतदान केंद्राच्या एकंदर परिसराचीही त्यांच्याकडून यावेळी पाहणी करण्यात आली. मतदान केंद्र असणाऱ्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही आहेत का याचीही माहिती त्याच्याकडून घेण्यात आली.
निवडणुकीच्या मतदानादरम्यान होणारी गर्दी, गर्दीची ठिकाणे, त्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. मतदाना दरम्यान होणाऱ्या वाहतुकीचे नियंत्रण व त्या वाहतुकीच्या मार्गामध्ये कोणते बदल करावे लागतील याबाबतची ही माहिती यावेळी घेण्यात आली. मतदान केंद्रावरती प्रत्यक्ष द्यावयाच्या बंदोबस्ताच्या नियोजनाबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.