पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्त फुलांनी सजविलेल्या रथातून पंढरपूर शहरामधून काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सचिव प्रिं. डॉ. जे. जी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अमरजित पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, सुनेत्राताई पवार, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम अनंतकवळस, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, मुख्याध्यापिका अनिता साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
ढोल ताशा, लेझीम आणि टिपरी नृत्याने या रॅलीची रंगत वाढविली. या रॅलीत यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, रयतमाउली सौ. लक्ष्मीबाई, आर्मीचे सैनिक यांचा जिवंत देखावा तयार केला होता. ही रॅली पंढरपूर शहरातील कॉलेज – सरगम चौक – इंदिरा गांधी चौक – भोसले चौक – अर्बन बँक – भादुले चौक – नगर पालिका – छत्रपती शिवाजी चौक – सावरकर पुतळा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन – मार्केट यार्ड – कॉलेज या मार्गाने मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची महती सांगणारे फलक धारण केले होते. रिक्षातून लाउड स्पीकर वरून कर्मवीरांचे कार्य, त्यांच्या विषयी अभ्यासक आणि साहित्यिकांनी व्यक्त केलेली मते उद्धृत केली गेली.
या रॅलीच्या वेळी कर्मवीरांच्या प्रतिमेस पंढरपूर शहरातील रयतप्रेमी संतोष भाऊ नेहतराव, बाळासाहेब नेहतराव, जयवंतराव माने, शंकर खरात, नवनाथ खरात, तानाजी खरात, महादेव लोहकरे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, धर्मवीर शिवाजी आप्पा कोळी, राजकुमार लवटे, भारत भिंगे, राजू निंबाळकर, संजय मुळे, संत सद्गुरू गाडगे महाराज येथील अशोक माने, एम. एम. पावले यांनी पुष्पहार अपर्ण करून आदरांजली वाहिली.
ही रॅली यशस्वी करण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन प्रशासन, पंढरपूर नगर पालिका प्रशासन यांनी विशेष सहकार्य केले. शेवटी रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी मानले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून रॅलीची सांगता करण्यात आली.