मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रातील लाखो-भगिनींचे आशीर्वाद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहेत यामुळे उद्धवजीच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास राखी बांधना दिवशी शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी व्यक्त केला.
रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना राखी बांधली व त्यांना सुख , शांती ,समाधान ,आरोग्य दीर्घायुष्य तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळो, अशी प्रार्थना केली , महाराष्ट्रातील तमाम जनतेचे व माता-भगिनींचे उद्धवजी ठाकरे हेच रक्षण करू शकतात, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच महिलांच्या संरक्षणासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहिला आहे , असेही अस्मिता ताई गायकवाड यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील हजारो भगिनींचे व तमाम जनतेचे आशीर्वाद उद्धवजीच्या पाठीशी असल्यामुळे तेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, महाराष्ट्रातील तशी आस जनतेलाही लागून राहिली आहे .
यावेळी महाराष्ट्रातील माता भगिनींचा आधार व शिवसेना महिला आघाडीचे श्रद्धास्थान असलेल्या रश्मी (वहिनी) उद्धवजी ठाकरे यांनाही उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व तमाम महाराष्ट्रातील महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल ऋण व्यक्त केले, रश्मी वहिनींच्या कार्याचा व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा अभिमान आहे, माझ्यासारख्या असंख्य महिलांच्या त्या आदर्श आहेत असेही अस्मिता गायकवाड म्हणाल्या.