सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात मराठा आरक्षणा करिता शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये सोलापूर वकील संघातील जेष्ठ व मान्यवर वकीलांनी देखील सहभाग नोंदविला . ही मराठा आरक्षणा साठीची निर्णायक व संविधानिक लढाई आहे . मराठा समाज मागास असल्याचे वेगवेगळ्या आयोगाने दिलेल्या अहवालावरून सिध्द झाले आहे.शासनकर्ते याला राजकीय स्वरूप देऊन हा लढा मोडण्याचा प्रयत्न करीत आहे.यामुद्यावरून बांगलादेशा सारखी स्थिती निर्माण होण्याची भिंती निर्माण झाली आहे.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निर्णय घ्यावेत अशी मागणी देखील वकिलानी केली .
या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे ॲड .सुरेश- बापू गायकवाड ज्येष्ठ वकील इंद्रजीत पाटील ॲड .दादासाहेब जाधव ॲड .विक्रम काटोळे ॲड .लक्ष्मण भोसले ॲड प्रज्योत मुटकुळे ॲड बाबूंशा साळुंखे, ॲड.समाधान दळवे,ॲड अजीत.पाटील,ॲड . प्रशांत देशमुख/ॲड.प्रविण निकम ,बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तामामा मुळे आदीनी उपस्थिती दर्शवून सांगितले.