मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
शुल्कासाठी विद्यार्थ्यांचे निकाल, शाळा सोडल्याचा दाखला अडवणे, शुल्कासाठी विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर शुल्क बाकी असल्याचे शेरा मारणे या सारखे मनमानी करणाऱ्या मुंबईतील खाजगी शाळांचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही आहेत, आता भांडुप येथील खाजगी ब्राईट हायस्कूल आणि ज्युनियर काॅलेज या शाळेने शुलक न भरु शकणाऱ्या ईयत्ता ९ वी तील विद्यार्थ्याला चाचणी परीक्षेच्या २ पेपर ला बसु दिले नाही तसेच शुल्क घेऊन ये अन्यथा शाळेत येऊ नको असे सांगून शाळाबाह्य केले.
पालक रविंद्र कांबळे यांनी फि सुलभ हफत्यात भरतो असे शाळा प्रशासनास वारंवार सांगुन देखील शाळेने असे माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार करुन विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण केले व त्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणले, पालकांनी त्यांची व्यथा *महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांच्याकडे मांडल्यावर, दळवींनी शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार करुन शाळा मुखयाद्यापक व प्रशासनावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
महासंघाचे नितीन दळवी यांचा आरोप आहे कि अशा प्रकारात शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेवर कारवाई करत नाहीत तसेच शाळा प्रशासनाला पाठिशी घालणाचे काम करतात, मागील वर्षी विक्रोळीच्या विद्या विकास संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर ईंग्लिश हायस्कूल शाळेने १० वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर रू ६००००/- शुल्क बाकीचा शेरा मारला होता व दुसऱ्या एका विद्यार्थनीचा १० विचा निकाल व शाळा सोडल्याचा दाखला अडवला होता पण आजतागायत शाळा प्रशासनावर शिक्षण निरीक्षक उत्तर मुंबई यांनी कारवाई केलेली नाही व याबाबत तक्रार दाखल केल्यावर शिक्षण उपसंचालक यांनी आता वर्षभराने पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश शिक्षण निरीक्षकांना दिले, असे शाळेला पाठिशी घालण्याचे प्रकार शिक्षण विभागातील अधिकारी करत आहेत आणी या मुळेच खाजगी शाळांची मनमानी दिवसेंदिवस वाढत आहे या प्रकारावर आळा घालण्यासाठी शिक्षण विभाग सपशेल अपयशी आहे असे महासंघाचे दळवींचे म्हणणे आहे.