पक्षाचे संस्थापक मारुती केसकर यांची पत्रकार परिषदेत घोषणा
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे वारी जोरदार वाहू लागले आहे. विविध राजकीय पक्षांनी आपापल्या परीने जयदत्त तयारी सुरू केली आहे. अशातच महाराष्ट्र बहुजन सन्मान पार्टीनेही या आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या पक्षाकडून 25पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक मारुती केसकर यांनी केली आहे.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना केसकर म्हणाले की, आमचा पक्ष हा अधिकृत पक्ष म्हणून भारत निर्वाचन आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. यामुळे आगामी विधानसभा लढविण्यात येणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने, राज्यामध्ये प्रस्थापित मंडळींना धक्का देण्यासाठी, तिसरी आघाडी निर्माण होऊ पाहत आहे. या तिसऱ्या आघाडीमध्ये आमचा पक्ष सामील होऊन आम्ही मोठ्या ताकतीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचेही सांगितले.
आजवर राज्यांमध्ये जे सत्ताधारी होते. त्यांनी शेतकऱ्यावर केवळ अन्यायच केला. कायम शेतकरी विरोधी धोरणे राबविल्यामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. याबाबत आपला पक्ष यापुढील काळात केवळ शेतकऱ्याची हिताची धोरणे राबवून, शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करणार असल्याचे सांगितले. सरकारकडून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर साठी टोल मुक्ती मिळावी. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा. शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसानीची पंधरा दिवसात भरपाई मिळावी. नुकसान भरपाईच्या 75 टक्के किमान रक्कम मिळावी. यासह विविध विषय डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सरकार पुढे मागणी करणार असल्याचेही केसकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेच्या वेळी जे के गायकवाड, वसंत हाके, एडवोकेट यासीन शेख, एडवोकेट विजय हिरवे, प्राचार्य तानाजी केसकर, सचिन तांदळे, संजय माने, संजय लेंगरे, अन्सार मुलानी, बापूसाहेब लवटे यांचेसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.