पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रे दरम्यान वारकऱ्यांना सुविधा पुरवण्यासाठी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचातीस निधी देण्यात आला आहे. सदरच्या निधीचे योग्य नियोजन करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शनिवारी (ता.६) लक्ष्मी टाकळी परिसराची पाहणी केली.
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामाच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ग्रामपंचायतीला प्रथमच भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार लक्ष्मी टाकळी ग्रामपंचयतीला यंदा प्रथमच आषाढी वारीसाठी निधी नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सदरचा निधी ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आला आहे. हा निधी प्राप्त होण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे यांनी विशेष प्रयत्न केले होते. या दिलेल्या निधीचे नियोजन करण्यासाठी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी आषाढी यात्रेसाठी लक्ष्मी टाकळीमध्ये करण्यात येणाऱ्या सुविधांची रूपरेषा ठरविण्यासाठी पाहणी केली.
यावेळी त्यांनी टाकळी ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न करून विकसित केलेल्या तलावाची व बंधाऱ्याची पाहणी करून ग्रामपंचायतिचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य अधिकारी श्रीकंदे, अमोल जाधव, गट विकास अधिकारी सुशील संसारे, ग्रामपंचायत सरपंच संजय साठे, उपसरपंच महादेव पवार, ग्रामसेवक जयंत खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य व सर्व कर्मचारी उपस्थित होते.