पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
शब्दशिल्प कलाविष्कार संघ गिरीजा महिला मंच नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित राजमाता जिजाऊ साहित्य संमेलनात कल्याण येथील कवयित्री लेखिका प्रियंका संदीप कोठावदे यांच्या ओंजळ या अलक कथा संग्रहाचे मोठ्या थाटात प्रकाशन झाले.
सदर संमेलनात संमेलन अध्यक्ष बाल साहित्य पुरस्कार प्राप्त माननीय एकनाथ आव्हाड, स्वागत अध्यक्ष हिरकणी सौ गीतांजली वाणी संमेलन उद्घाटक प्रसिद्ध मालिका चित्रपट दिग्दर्शक माननीय सचिन गोखले, प्रमुख अतिथी आयपीएस रविंद्रजी शिसवे ,गिरीजा महिला मंच अध्यक्ष माननीय अश्विनी बोरस्ते , प्रमोद महाडिक नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा, सुप्रसिद्ध पत्रकार माननीय पंकज दळवी, गझलकार रवींद्र देशमुख संमेलन महासंयोजक माननीय सोनाली ताई जगताप, तसेच हिरकणी सौ अनिता ताई गुजर हिरकणी राजश्री ताई बोहरा. आदी उपस्थितांमध्ये प्रकाशन दणक्यात पार पडले .
विविध पुरस्कार प्राप्त पुस्तकांची निर्मती करणाऱ्या साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे सदर पुस्तक प्रकाशित झाले आहे.
प्रियंका कोठावदे यांनी त्यांच्या ओंजळ या अलक कथासंग्रहात मानवी जीवनाच्या भावभावनांचे चित्रण अतिशय मोजक्या आणि समर्पक शब्दात वर्णन केले आहे.सदर पुस्तक वाचकांना नक्की भुरळ पाडेल ,अशी भावना प्रकाशक वैभव धनावडे ह्यांनी व्यक्त केली.
तसेच सदर संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक माननीय. एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते प्रियांका कोठावदे यांना पु ल देशपांडे शब्दशिल्प पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले.समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.