नाविन्यपूर्ण कल्पनांना मूर्त रूप देणे गरजेचे- ए जी नगरकर
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
नाविन्यपूर्ण कल्पना आपल्यापैकी सर्वांना सुचत असतात एखादा शोध लिहिला गेला नाही तर तो लुप्त होतो म्हणून आपण केलेलं संशोधन हे लिहून काढणे गरजेचे आहे.समाजात वावरत असताना डोळे उघडून जगा त्यामुळे आपल्याला नवीन नवीन कल्पना सुचत जातात दैनंदिन जीवनात अनेक समस्या असतात त्यावर छोटे छोटे शोध किंवा कल्पनांना मूर्त स्वरूप देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डीआरडीओ चे माजी शास्त्रज्ञ श्री ए जी नगरकर यांनी केले. ड्रीम फाउंडेशन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वारी करिअरची- दिशा समृद्ध जीवनाची' या कार्यक्रमांतर्गत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या व्याख्याना प्रसंगी श्री नगरकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.शंकर नवले ड्रीम फाउंडेशनचे संचालक काशिनाथ भद्गुणकी, उपप्राचार्य ऍकडमीक डॉ.आर. टी. व्यवहारे, उपप्राचार्य प्रशासन एस एम जगदे उपस्थित होते.यावेळी प्राचार्य नवले यांनी मान्यवरांचे स्वागत केले व व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला.
पुढे बोलताना नगरकर यांनी विद्यार्थ्यांना रुटीन कामापेक्षा इनोव्हेटिव्ह आयडिया वापरण्याचा सल्ला दिला तसेच पेटंट व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले 'रंगीबेरंगी स्टेपलर' या अनोख्या कल्पनेचे पेटंट देखील कसे मिळवले याचा प्रवास उलगडून दाखवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रावणी नवले व रिद्धी पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर एस एस शिरगण यांनी मानले.