पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज या पालखी महामार्गावरील भंडीशेगाव येथील श्रीमंत बाजीराव पेशवे विहिर परिसरात विभागीय आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे हे उपस्थित होते.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशा प्रकारचा वृक्ष लागवडीचा संदेश दिलेला आहे.त्याचप्रमाणे वृक्षांचे महत्त्व त्यांनी त्यांच्या अभंगातून वर्णन केले आहे.झाडे ही मानवाच्या जगण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे,या झाडामुळे प्राणी,पक्षी,मानव आज जिवंत आहेत.आपण कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व ओळखले आहे.या पुढील काळात प्रत्येकाने वृक्ष लागवड केलीच पाहिजे,असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे यांनी व्यक्त केले.
श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर ही 1800 च्या दशकात बाजीराव पेशवे यांनी बांधली असून,अतिशय रेखीव अशा पद्धतीची ही विहीर आहे, त्याचप्रमाणे या विहिरीची निर्मिती बारव या प्रकारात मोडत असून या विहिरीचा स्वतंत्र असा अठ्ठावीस गुंठे उतारा आहे.या विहिरीवरील दगड काही अंशी चोरीस गेले असून लवकरच नवीन दगड आणून सर्वांच्या सहभागातून विहिरीस पहिल्यासारखे रूप देनार असल्याची माहिती कॅप्टन श्यामराव लोकरे अभ्यासिकेचे अध्यक्ष डॉ.श्रीधर यलमार यांनी दिली.
श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर ही अत्यंत पुरातन विहीर असून या परिसराचे शुशोभीकरण खूप महत्त्वाचे आहे.त्याचप्रमाणे या परिसरातील सर्वच नागरिकांनी या वृक्षांची जबाबदारी घेतली पाहिजे, वृक्ष लागवड ही चळवळ झाली पाहिजे,वृक्ष असल्याने आपले आरोग्य चांगले राहते,निरोगी राहते, मन प्रसन्न राहते आणि वृक्ष ही जगण्याची प्रेरणा देतात,त्यामुळे प्रत्येकाने घरासमोर तुळशी वृंदावना बरोबरच किमान पाच वृक्ष लावले पाहिजेत,असे मत पंढरपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी व्यक्त केले.
यावेळी विहीर परिसरात लोखंडी जाळीचे कंपाउंड तयार करून देण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेचे नेते तानाजी बागल यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनिल कंडरे यांनी केले तर आभार उपसरपंच विजय पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सचिन इथापे,तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे,उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक महेश सुडके,मुंबई येथील उद्योजक,वृक्षमित्र अजित कंडरे,अक्कलकोटचे प्रशासनाधिकारी शाहू सतपाल, भास्कर ननवरे, पंढरपूरचे त्वचा रोग तज्ञ डॉ.अरुण मेनकुदळे, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे,जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल,बंडीगिरी महाराज अन्नदान ट्रस्टचे वामन यलमार,संतोष करचे,चंद्रशेखर कोळवले, गणेश ग्रामविकास अधिकारी जी.बी.नरसाळे पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव कोळवले, संजय रणखांबे,जगन ननवरे,जैनुद्दीन मुलानी,महेंद्र येलपले, राघू कवडे,मारुती गिड्डे,संतोष ननवरे, विश्वास सुरवसे, मंगेश ननवरे ,साधना गिड्डे, शिवम ज्वेलर्सचे आबासाहेब बाबर,सोलापूर सोशल फाउंडेशन,ग्रामस्थ,भजनी मंडळ श्रीनाथ विद्यालयातील विद्यार्थी, कोहिनूर वेलनेस ग्रुप चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.