लेकीचं झाड.संतांचे झाड हा उपक्रम प्रत्येक गावाने राबिवला पाहिजे:-प्रांताधिकारी सचिन इथापे
झाड ही देवाची आणि संतांची रुप आहेत ती लावा आणि वाढवा:-ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे
"करकंब गावच्या लेकीचं झाड" अभियान टीमच्या माध्यमातून करकंब मध्ये गेल्या तीन वर्षांपासून "लेकीचं झाड" ह्या अभिनव संकल्पनेतून वृक्षारोपण मोहीम सुरू केली होती.त्यामधून त्या मोहीमेचा वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी संतांच्या नावा बरोबर आईचं झाड,आज्जीच झाड, आजोबांचं झाड, सुनेचं झाड, लेकाच झाड,आणि वाढदिवसाच्या निमित्ताने झाड लावायची मोहीम सुरू केली असून सर्व करकंबकर ग्रामस्थांच आणि पंचक्रोशीतील अनेक वृक्षप्रेमींच अनमोल तन मन धनानी सहकार्य मिळत आहे.तेंव्हा करकंब येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक संतांच्या पालख्या त्यामध्ये संत निवृत्तीनाथ,संत एकनाथ संत जनार्दन स्वामी,संत कैकाडी बाबा,संत किसनगिरी बाबा,संत गजानन महाराज,शनिदेव, माऊलींच्या रेड्याची पालखी बरोबर लाखो वारकऱ्यांची मांदियाळी करकंब मध्ये दोन दिवस असते.आणि त्याच वारकऱ्यांची श्रध्दास्थान असलेल्या अनेक संतांच्या नावानं झाडे लावण्याचा शुभारंभ शनिवार दिनांक ६ जून रोजी दुपारी १ वाजता श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी तळावर संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या आधी करकंब गावच्या प्रदक्षिणा मार्गावरून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले .त्यानंतर संत तुकाराम महाराज यांचे वशंज आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे प्रांताधिकारी सचिन इथापे. तहसीलदार सचिन लंगुटे. बाळासाहेब देशमुख ,राहुल काका पुरवत पोलीस अधिकारी सागर कुंजीर साहेब, डॉ श्रीकांत देवकते,बापू शिंदे,सतीश चव्हाण,संतोष स्वामी,पत्रकार सुर्यकांत बनकर, सचिन शिंदे,एल एम जाधव, उपस्थित होते.यावेळी शिवाजी महाराज मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की झाड ही संतांची आणि परमेश्वराची रुप आहेत.कारण झाड तोडणाऱ्यांना आणि झाड लावणाऱ्यांनाही सावली देतात.सध्याच्या काळात ५३ अंशावर तापमान गेलय भविष्यकाळात तापमान कमी करायचं असेल तर प्रत्येकांनी झाड लावली पाहिजेत.सांगून करकंब गावच्या लेकीचं झाड अभियानाच कौतुक करुन सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.तसेच प्रांताधिकारी सचिन इथापे साहेबांनी ह्या संतांच्या नावाने करत असलेल्या अभिनव वृक्षारोपण कार्यक्रमाला शुभेच्छा देत हा उपक्रम प्रत्येक खिशात राबविला पाहिजे.असे सांगितले.भविष्यकाळात आणखी झाड लावून करकंब गाव हिरवगार आणि स्वच्छ करण्यासाठी सर्वांना मोठी प्रेरणा मिळाली असून सर्वांच्या सहकार्याने निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हरिश्चंद्र वास्ते, गणेश पिसे, प्रमोद रेडे पाटील, विशाल बोधे, पांडुरंग काटवटे, बापू खारे, नागेश खारे, देविदास काटवटे, विश्वजीत शिंदे, चेतन पुरवत,महिलांमध्ये जागर टीम ची संकल्पक अंजली टकले.अनुराधा नडे, तनिष्का गटप्रमुख वृषाली बोधे तृप्ती पुरवत, पूजा रणदिवे,सौ.भाळवणकर,आशा टकले,आदींनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.