एकलव्य अभ्यासिकेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
दत्तात्रय खंदारे, सुवर्णा टकले नागनाथ घाटुळे एकलव्य पुरस्काराने सन्मानित
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
करकंब येथे गेल्या वर्षी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी आणि सर्वं सोयींनी युक्त अशा एकलव्य अभ्यासिकेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा झाला यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी खडतर प्रयत्नाशिवाय पर्याय नाही बोलताना काशिनाथ भतगुणकी सांगितले.
सुरुवातीला श्री अब्दुल एपीजे कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन श्री काशिनाथ भतगुणकी मुख्याध्यापिका संगीता बुगड,अजीत पवार सर,किसन सलगर सर, हेमंत कदम सर, संजय सांगोलकर आणि नुतन अध्यक्ष प्रमोद रेडे पाटील नुतन सचिव हरिश्चंद्र वास्ते रघुनाथ जाधव साहेब ज्ञानेश्वर दुधाणे, राजेंद्र करपे,संतोष भोसले.पत्रकार लक्ष्मण जाधव,यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
प्रास्ताविक उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी वर्षभरात एकलव्य अभ्यासिकेचा आलेख सांगून करकंब व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य अभ्यासिका अतिशय महत्त्वाची आहे सांगितले.त्यानंतर प्रथम वर्धापन दिनानिमित्त करकंब मधील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दत्तात्रय खंदारे , सुवर्णा टकले, आणि नागनाथ घाटुळे या शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन एकलव्य पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले त्यानंतर करकंब मधील १० वी व १२ वी मधील पहिल्या तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.आणि एकलव्य अभ्यासिकेचे नुतन अध्यक्ष प्रमोद रेडे पाटील आणि सचिव म्हणून हरिश्चंद्र वास्ते यांची एकमताने वर्षभरासाठी निवड करुन सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाला सुरुवात झाली त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की भविष्यात आणि आपलं जीवन जगताना यशस्वी होण्यासाठी कुठंही शॉर्टकट वापरु नका स्वतःला झोकून देऊन स्पर्धा परीक्षांची तयारी केली तर यश आपल्याच हातात असून यश आल्यानंतर दुनिया आपल्या मुठीत असेल.त्यासाठी विद्यार्थी दशेतच आपल्याला काय व्हायच आहे ते ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल ठेवली पाहिजे.सध्या संगणकाच्या युगात स्पर्धा भरपूर वाढली आहे.यात टिकून राहायचं असेल तर नवनवीन निघालेल एडव्हान्स नॉलेज आत्मसात केले पाहिजे.थोडफार मातृभाषे बरोबर इंग्रजी भाषाही आत्मसात केली पाहिजे असे सांगितले.
जीवनात अनेकांना अपयश आले तरीही न डगमगता अथक परिश्रम घेत अनेकजण जीवनात यशस्वी झाल्याचे सांगून ग्रामीण भागातील एकलव्य अभ्यासिकेचा हा अभिनव उपक्रम अतिशय स्तुत्य असून सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन जीवनात मी यशस्वी होणारच ही शपथ घेऊन कामाला लागा आणि त्यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांना आवाहन केले.आई वडीलांच्या मान राखा ,समामाजात ताठ मानेने जगा,आई वडीलांनी ही आपल्या पाल्याकडे लक्ष देणेही महत्वाचे आहे.
यावेळी करकंब मधील विद्यार्थी विद्यार्थिनी जागरूक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी दत्तात्रय खंदारे किसन सलगर,रघुनाथ जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन नंदलाल कपडेकर यांनी करत प्रमोद रेडे पाटील यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास काटवटे, वृषाली बोधे,विशाल बोधे,बापू खारे, गणेश पिसे, नागेश खारे माऊली मुखरे, अमृता रसाळ, देवकी दुधाणे दीपक जाधव,खपाले सर आदींनी अधिक परिश्रम घेतले.