तुंगत प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांचा वापर व्हायला हवा असे प्रतिपादन पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथवाडी याठिकाणी माजी सरपंच बळवंत धनवडे यांनी केले. भैरवनाथवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती निवड कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन धनवडे बोलत होते.
केंद्रीय प्राथमिक शाळा भैरवनाथवाडी येथे शालेय व्यवस्थापन समितीची दि २५ रोजी निवड करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित पालकांमधून चर्चा होऊन अध्यक्षपदी भजनदास डुबल तर उपाध्यक्षपदी सुधीर सोनवर यांचेसह नवनिर्वाचित सर्व सदस्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, यांचा उपस्थित पालक आणि शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पुढे बोलताना धनवडे म्हणाले, आजमितीस ग्रामीण भागात व्यवस्थापन समितीला राजकीय व्यासपीठाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणजे गावाचा दुसरा सरपंच असतो , कारण शासनाकडून शाळेच्या भौतिक विकासासाठी व गुणवत्ता संवर्धनासाठी लाखो रुपयांचा निधी येत असल्यामुळे गावागावांतील शाळांत राजकारणाचा हस्तक्षेप होताना आढळून येत आहे.
परंतु पांडुरंग कारखान्याचे संचालक लक्ष्मण (तात्या) धनवडे यांचे मार्गदर्शनानुसार या भागातील नारायण चिंचोली आणि भैरवनाथवाडी गावच्या जि. प. शाळा यास अपवाद आहेत. या ठिकाणी प्रशासन शाळा व्यवस्थापन समितीला खूपच चांगल्या प्रकारे सहकार्य करून शाळेचा विकास करीत आहेत. व्यवस्थापन समिती अधिकाराबरोबरच प्रशासनाचे बळकटीकरण झाल्यास शैक्षणिक विकास निश्चित होईल व राजकारणविरहित सामाजिक क्रांती शाळाशाळांत येईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉक्टर अनिल गाजरे. हरिभाऊ खरात, दादा सोनवर, भानुदास गाजरे, भाऊसाहेब माने रंजीत भोसले महादेव डुबल भिमराव हजारे मुख्याध्यापक रतन कुमार शिवशरण, बामणे मॅडम, उत्पात मॅडम, सिंधुबाई खरात, व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.