पुळुज प्रतिनिधी तेज न्यूज
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची 150 वी जयंती पुळुज ग्रामपंचायत च्या वतीने साजरी करण्यात आली.
राजश्री शाहू महाराज, हे कोल्हापूर संस्थानाचे राजे म्हणून त्यांनी 28 वर्ष कारभार पाहिला. पुढे त्यांनी राज्यांमध्ये दुष्काळ पडला. गोरगरीब अन्नाविना उपाशी राहू लागले त्यातच प्ले च्या साथीने थैमान घातलं होतं हा हा म्हणता संपूर्ण महाराष्ट्रात प्ले ची साथ आली.आणि हजारो च्या संख्येने लोक मारू लागले. त्यावेळी शाहू महाराजांनी स्वतःच्या संस्थानातील खजिना मोकळा केला. पण जेवढी माणसं वाचवता येतील तेवढी त्यांनी वाचवली. शाहू महाराज यांच्यावर बोलताना लक्ष्मण लोमटे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यावेळी फोटो पुजन उपसरपंच असिफ अफसर शेख, यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित लक्ष्मण लोमटे,लक्ष्मण पांढरे, मोहन गावडे, नागनाथ वाघमोडे, ग्रामसेवक ढवळे भाऊसाहेब, दत्तात्रय पांढरे, गणेश वारे, कुंडलिक भोसले, विश्वास सावंत, आबा सावंत, सत्यवान भोसले, समाधान कांबळे, उपस्थित होते.