सिंहगड महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि उद्याचे जग या विषयावर व्याख्यान संपन्न
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भविष्यकाळात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण जे क्षेत्र निवडाल त्याचे मूलभूत ज्ञान आपल्याला तारू शकणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे काही नोकऱ्या जातील पण काही नवीन नोकऱ्या देखील तयार होणार आहेत आपल्याला जर आपल्या क्षेत्राचे मूलभूत ज्ञान असेल तर आपल्याला लर्न आणि अनलर्न करणे सोपे जाते असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक तथा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ अच्युत गोडबोले यांनी केले.
सिंहगड महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचाच एक भाग म्हणून स्टुडंट डेव्हलपमेंट अँड करिअर कौन्सेलिंग सेल तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि उद्याचे जग' या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी अच्युत गोडबोले बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.शंकर नवले रवींद्र मोकाशी डॉ. शेखर जगदे डॉ.आर टी व्यवहारे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी प्रास्ताविकात या व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला.
आपल्या व्याख्यानात गोडबोले यांनी आय टी क्षेत्रात आत्तापर्यंत झालेल्या स्थित्यंतरांचा आढावा घेतला व सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मुळे किती आमूलाग्र बदल होतोय हे स्पष्ट केले. येत्या काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ला पूरक अशी कौशल्ये आत्मसात करावी लागतील. तरच टिकाव लागणे शक्य आहे असेही नमूद केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सुमारे ४००विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शशिकांत हिप्परगी व प्रा. विनय जोकारे यांनी परिश्रम घेतले. वक्त्यांचा परिचय प्रा. रवींद्र देशमुख यांनी तर सूत्रसंचालन प्रा.ए. ए. अलीम यांनी केले.