पाच तासांच्या अथक परिश्रमातून वटवृक्ष उभा करकंबकर ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य
देशपांडे परिवाराने १०० वर्षांपूर्वी लावलेला वटवृक्ष पुन्हा उभा
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
गेल्या आठवड्यात करकंब आणि करकंब पंचक्रोशीतीत वादळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे शेतकरी राजांच्या शेतीच नुकसान तर झालंच पण अनेक झाडे उन्मळून पडली होती.त्यामध्ये करकंब येथे जुन्या पोस्ट ऑफिस शेजारी देशपांडे परिवाराने लावलेला १०० वर्षाचा वटवृक्ष ही उन्मळून पडला होता,त्याचवेळेस देशपांडे परिवाराचे विद्यावाचस्पती पांडुरंग देशपांडे काकांचा निरोप आला तो वटवृक्ष पून्हा उभारु शकाल का.?...मी लगेच होकार दिला.सर्व अर्थिक सहभाग देशपांडे परिवारानेच उचलला.आणि आमचे मित्र अजय जाधव आणि सर्व वृक्षप्रेमी ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही कामाला सुरुवात केली.बघता बघता वृक्षांचे फाटे कापून पूर्ण खोड ठेऊन जेसीबी आणि क्रेनच्या पाच तासांच्या अथक परिश्रमातून वटवृक्ष पुन्हा उभा झाला.हे करीत असताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले.पण काम फत्ते झाले.सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने जे काम झालं त्या कामाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.हे झाड आता पुन्हा सावली देणारं या आनंदाने.याकामी क्रेनचे मालक नामदेव भंडारे, जेसीबी चालक दिनेश व्यवहारे बालाजी शिंदे यांचे चातुर्य अधिक दिसून आले.
करकंब गावच्या ग्रामस्थांचे अनमोल सहकार्या बरोबर करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे,अजय जाधव,तसेच पोस्ट ऑफिस जवळील सर्व करकंबकर ग्रामस्थ त्यामध्ये,अक्षय साठे,तानाजी क्षीरसागर,अक्षय करळे,मदन जाधव, ओंकार पवार,ताजुद्दीन कोरबू,पपू जाधव, विश्वजीत शिंदे, सचिन कुलकर्णी,संतोष भोसले,राजेश मेणकुदळे, अब्दुल शेख, यांचे अनमोल सहकार्य लाभले.एका झाडाच पुनर्वसन करण्याच भाग्य आम्हां सर्वांना मिळालं यांचा मनस्वी आनंद वाटला.भविष्यकाळात तो पुन्हा सावली देणारं ह्या आशेने.