पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एन एच 965 या राष्ट्रीय महामार्गवरील वाखरी ब्रिज ते पंढरपूर कर्मवीर कॉलेज चौक काम जलद गतीने करून घ्यावे. या अर्धवट कामामुळे आगामी आषाढी वारीतील भाविकांना त्रास होणार नाही. याची काळजी घ्यावी. आशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक यांना लेखी निवेदन गुरुवारी देण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग 965 या हायवेवर वाखरी ब्रिज ते कर्मवीर कॉलेज चौक पंढरपूर, यादरम्यान चौपदरीकरण करण्याचे काम काही दिवसापासून चालू आहे.ते काम एकदम ढीम गतीने चालू आहे. कोणतेही कामाचे व्यवस्थित नियोजन नाही. रोडवरती बॅरिगेट पडलेले असतात. त्या भागात वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. येणारी आषाढी वारी सगळ्यात मोठी वारी असल्याने,त्या वारीला लाखो लोक या मार्गांवरून पंढरपूरला येत असतात. त्यांची ह्या रोडच्या माध्यमातून मोठी गैरसोय होणार असून, ते जलद गतीने काम व्हावे ही आमची प्रमुख मागणी आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराळा उडाला जातो, पाणी मारून त्याचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे. याची आपण नोंद घेऊन ठेकेदार यांनाही आदेश देऊन जलद गतीने काम मार्गी करण्याबाबत सुचना देण्यात याव्यात.असेही निवेदनात सांगितले आहे. आषाढी वारी कालावधीमध्ये वारकऱ्यांना त्रास झाल्यास, वारकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन उभं करण्यात येईल.असा ईशाराही छावा क्रांतिवीर सेना वतीने देण्यात आला आहे.
याबाबत छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सहसंपर्क प्रमुख गणेश माने यांनी निवेदन दिले असून, या निवेदनाच्या माहितीसाठी प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सोलापूर, प्रांताधिकारी पंढरपूर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.